मोरगाव, ता. बारामती ः बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात मोरगाव, मुर्टी परिसरांत परतीच्या पावसाने (Heavy Rain Baramati) खरीप हंगामातील (Kharif Season) बाजरीचे नुकसान (Pearl Millet Crop Damage) झाले आहे. काढणी केलेल्या बाजरी खळ्यावरच असल्याने नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
खरिपातील बाजरीचा काढणी हंगाम सरू असून, अनेक ठिकाणी बाजरी कापून शेतातच ठेवली होती. झालेल्या पावसाने बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप नाही दिली तर हे पीक पूर्ण हातातून निसटण्याची शक्यता असल्याचे मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे यांनी सांगितले.
नुकसानीमुळे बाजरीचे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. यामुळे दर वाढीची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यांमध्ये पडलेल्या पावसामुळे एकीकडे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके पावसात अडकले आहेत, तर दुसरीकडे रब्बी हंगामामधील पेरण्या झालेली पिके अतिवृष्टीमध्ये अडकली आहेत.
त्यामुळे ती पिकांच्या दुबार पेरण्या करण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी खुडणी केलेल्या बाजरीची कणसे आजही खळ्यात असून गेली काही दिवस पावसाने भिजणे, एक दिवस उघडीप दिल्यानंतर वाळणे, दुसऱ्या दिवशी परत भिजणे अशा प्रक्रियेमुळे बाजरीच्या कणसांना कोंब उगवले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
पंचनामे करण्याचे लेखी आदेश नाहीत
बारामती तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी दिले आहेत. मात्र हे आदेश लेखी नसल्याचे सांगून गावकामगार तलाठी व कृषी सहायक यांच्याकडून अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली नसल्याची परिस्थिती आहे. मात्र खरीप व रब्बी दोन्ही हंगामामधील पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले असून, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.