
Sangli News : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी केली होती. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केल्याने पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजना सुरू केली. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारली. त्यातच दुष्काळी पट्ट्यातील कवठे महांकाळ, जत यातालुक्यात वळीवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली होती.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभाग पुढाकार घेईल, अशी शक्यता होती. परंतु धरणातच पाणीसाठा कमी असल्याने ही योजना सुरू करण्याचे धाडस पाटबंधारे विभागाने केले नव्हते.
गेल्या पंधरा दिवसांपासून दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजना सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने दोन दिवसांत कवठे महांकाळ तालुक्यात आणि तेथून जतमध्ये पोहोचले.
ताकारी, टेंभू योजना कधी सुरू होणार?
दुष्काळी पट्ट्यातील, पलूस, तासगाव तालुक्यांसह खानापूर तालुक्याला ताकारीचे तर कडेगाव, विटा, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांना टेंभूचे पाणी मिळते. परंतु या योजनाही सुरू करण्याची मागणी होत आहे. म्हैसाळ योजना सुरू झाली. आता ताकारी योजना कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.