Crop Harvesting : काढणीला आलेल्या पिकांची वाताहत
औरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांत काढणीला आलेल्या पिकांची वाहतात (Crop Damage) करणे सुरू केले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका, मध्यम, दमदार ते जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली.
औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५२ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. काही मंडलांत मध्यम हजेरी लावणारा पाऊस बहुतांश मंडलात तुरळक स्वरूपाचा बरसला. खुलताबाद तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी १५ मंडलांकडे
पाठ फिरवणारा पाऊस ३४ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार स्वरूपात बरसला. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी व सुखापुरी या दोन मंडलात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २३ मंडलाकडे पावसाने पाठ फिरवली.
तर ४० मंडलांत पावसाची हजेरी तुरळक, हलकी, मध्यम स्वरूपाची राहिली. जिल्ह्यातील परळी, धारूर तालुक्याकडे पावसाने पूर्णतः पाठ फिरवली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ४४ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील १६ मंडलांत पावसाचा टिपूसही बरसला नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३६ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती करणे सुरू केले आहे. कपाशी पिकात बोंड्सडचा प्रादुर्भावही वाढला आहे. दुसरीकडे काढणीला आलेल्या सोयाबीनची ही पावसामुळे माती होण्याची चिन्ह आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.