Crop Insurance : नुकसानग्रस्तांना विम्याची प्रतीक्षा

यंदा पावसाळ्यात अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

नांदेड : मागील खरिप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चार लाख ७३ हजार ५७० विमाधारक शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे (Crop Insurance Company) ७२ तासांत माहिती कळविली होती.

यात नुकसानग्रस्तांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख तर काढणी पश्‍चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी २८ लाख असे एकूण १०१ कोटी २५ लाखांचा परतावा मंजूर झाला. परंतु हा विमा (Vima) अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत.

जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत (Pradhan Mantri Peek Vima Yojana) खरिप हंगाम २०२२ मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शूरन्स कंपनीकडे दहा लाख ५७ हजार ५०८ अर्जदार शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केले होते. यात सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, उडीद व मुग या पिकांसाठी विमा काढण्यात आला होता.

दरम्यान यंदा पावसाळ्यात अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

यामुळे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.

यानुसार जिल्ह्यात चार लाख ७३ हजार ५७० विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत माहिती कळविली होती.

यात कपंनीकडून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना स्थानिक नेसर्गीक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख तर काढणी पश्‍चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी २८ लाख असे एकूण १०१ कोटी २५ लाखांचा परतावा मंजूर केला आहे.

Crop Insurance
Amravati News: पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन

हा परतावा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. केंद्र तसेच राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना वितरीत करण्यात येणारा विमा हप्ता कंपनीकडे जमा होताच तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

मिड सिझन अॅडव्हर्सिटीचे ५७ कोटी थकीत

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील सव्वापाच लाख हेक्टर वरिल पिकांचे नुकसान झाले होते.

या मुळे जिल्हाधिकऱ्यांनी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (मिड सिझन अॅडव्हर्सिटी) घटकामंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के भरपाई मिळावी यासाठी अधिसुचना जाहीर केली होती.

ही अधिसुचना विमा कंपनीने मंजूर करुन सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी या पिकांसाचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना ३६७ कोटींची रक्कम मंजूर केली.

यातील ८५ टक्क्यांनुसार ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर शिल्लक १५ टक्क्यांनुसार ५७ कोटी अद्याप मिळाले नाहीत. यासाठी ही विमा कंपनी सरकारच्या हिश्याकडे लक्ष देवून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com