Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे पिकांवर संकट
Jalna News : मागील पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. तसेच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिकांमध्ये तण, गवतांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत.
घनसावंगी तालुक्यात यंदा जून महिना कोरडा गेला. एखाद-दुसरा जोराचा पाऊस वगळता मागील पंधरा ते वीस दिवसापासून ढगाळ वातावरणाबरोबर रिमझिम सरी बरसत आहे. त्यातच कपाशीवर ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. सोयाबीन पिकात तणाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे.
त्यामुळे शेतकरी खुरपणी, मशागत करीत आहेत. शिवाय नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तणनाशकाचा वापर करावा. नत्र खताचा जास्त वापर झाला तर पिकांच्या कार्यक्षमतेत वाढ जास्त होते, त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.
त्यामुळे कपाशीला खत देतानाही कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. दरम्यान, शेतातील पिकांमध्ये रोगराईमुळे शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करत आहेत. दरम्यान, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा.
सिंचनांची सुविधा उपलब्ध शेतकऱ्यांनी ठिबक, तुषाराने पाणी देणे गरजेचे आहे. गवतांचे प्रमाण वाढल्यास आंतरमशागतीची कामे करण्याची गरज असल्याचे तालुका कृषी अधिकारी एस.एन.पवळ यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.