
Coriander Rates : राज्यातील शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. मागच्या तीन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरिप हंगाम धोक्यात येण्याची भिती आहे. तर सरकारच्या आडमुठे धोरणामुळे शेतमालाचे दर अचानक पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान टोमॅटो, कांदा, तांदुळ यानंतर आता कोथिंबीरचे दर अचानक पडल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीला दर नसल्यामुळे संपूर्ण एक एकर क्षेत्रावरील कोथिंबीरीवर ट्रॅक्टरने रोटर फिरवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांधे गावचे गोरखदादा आवारी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
दरम्यान गोरखदादा आवारी यांनी आपली व्यथा मांडली, कोथिंबीरीला भाव नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे. सध्या कोणत्याच पिकाचे उत्पादन खर्चही निघणे कठिण झाले. त्यामुळे मी संपूर्ण एक एकर कोथींबीरीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. शेतीमालाला भाव नाही, पाऊस पडत नाही.
शेतकऱ्यांनी जगवा की मरावं? सरकारनं लवकरात लवकर हमीभाव ठरवून दिला पाहिजे नाहीतर एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल असे शेतकरी आवारी यांनी भावना व्यक्त केल्या.
मागच्या काही दिवासांपूर्वी टोमॅटोला चांगला दर मिळत होता परंतु टोमॅटो परदेशातून निर्यात करत त्यावर केंद्राने नियंत्रण आणले. यानंतर कांदा दराला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत होता यावरही सरकारने निर्यातीवर शुल्क लावल्याने कांद्याचे दर अचानक कोसळले.
मागच्या काही दिवसांपूर्वी कोबी पिकालाही चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिके शेतात गाडली होती. दरम्यान आता कोथिंबीर पिकावरही हीच वेळ आली आहे. कांद्याबरोबर इतर पीक घेणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लागवड केलेल्या पिकातून उत्पादन खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.