
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या वातावरणात मोठा बदल (Climate Change) झाला असून दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असून थंडीदेखील कायम आहे. या वातावरणामुळे आंबा (Mango), काजू या फळपिकांवर (Cashew Crop) किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. एक-दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा थंडी गायब होणे, अचानक वारा सुटणे असे प्रकार सातत्याने सुरू असताना गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली.
१३ सेल्सिअस डिग्रीपर्यंत तापमान घसरले. एकीकडे थंडीचे प्रमाण वाढत असताना मंगळवारी (ता. २२) पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले. काही भागांत पावसाचा शिडकावादेखील झाला. त्यानंतर मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. बुधवारी सकाळपासूनदेखील ढगाळ वातावरण कायम आहे.
या वातावरणामुळे आंबा, काजू बागांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंबा, काजूला काही भागांत पालवी तर आंबा बागांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.