Agriculture Irrigation : सिमेंट बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार शाश्‍वत पाण्याचे माध्यम

Irrigation Project Maharashtra : बारामती तालुक्यात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्या माध्यमातून ५९ सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी १९.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
Cement Bunds
Cement BundsAgrowon
Published on
Updated on

Baramati News : बारामती तालुक्यात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्या माध्यमातून ५९ सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी १९.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्‍वत पाण्यासाठी हक्काचे माध्यम मिळणार आहे.

मोढवे गावामध्ये ३१ लाख रुपयांच्या निधीमधून सिमेंट बंधाऱ्यांचे काम पूर्ण केले आहे, तर जैनकवाडी येथे तीन बंधाऱ्यांच्या कामांसाठी ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

तीर्थक्षेत्र मोरगाव येथे सोनार शेत ओढ्यावर दोन बंधाऱ्यांसाठी ५४ लाख रुपये निधी मंजूर झाला. सध्या ही कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे तीन कोटी तीस लाख लिटर पाणीसाठा साठवणूक होणार आहे. सोनार शेत ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे २० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास या कामामुळे भरीव मदत होणार आहे.

Cement Bunds
Nira Canal Irrigation : नीरा डावा कालव्याच्या पहिल्या आवर्तनाला सुरुवात

बाबुर्डी येथे दोन बंधाऱ्यांच्या कामासाठी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, तर वाकी या ठिकाणीही सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून, या बंधाऱ्यासाठी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंजूर असलेली सर्व कामे दर्जेदारपणे करून घेण्याचे नियोजन जिल्हास्तरावरून करण्यात आले आहे.

Cement Bunds
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’मुळे ओढे-नाले तुडुंब

पावसाळ्यात सिमेंट बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उन्हाळ्यातही त्या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होत असल्याचा बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे या कामांचा भरीव फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील गेली अनेक वर्षांपासूनची वास्तविक स्थिती पाहिली, तर पावसाच्या पाण्या-व्यतिरिक्त शेतकऱ्यांकडे शेतीसिंचनाचे दुसरे कोणतेच माध्यम उपलब्ध नाही.

शेतकऱ्यांना कामांचा भरीव फायदा

जलसंधारण विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी जयेश हेडगिरे व शाखा अभियंता भूषण गाढवे म्हणाले, की पाणीसाठा होण्यास पूरक परिस्थिती असलेल्या ठिकाणी जलसंधारण विभागाच्या वतीने सर्व्हे करून बंधाऱ्यांची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली होती. त्याप्रमाणे औरंगाबाद महामंडळाकडून निधी उपलब्ध झाला आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून, या कामांचा भरीव फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

सिमेंट बंधारे पावसाच्या पाण्याने भरल्यानंतर शेतकऱ्यांची विहिरीची पाण्याची पातळी उन्हाळ्यात टिकत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीस विनाखर्चिक पाणी मिळून शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
- शीतल मोरे, मोढवे, सरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com