
Nagpur News : पीक विमा (Crop Insurance) उतरविलेल्या शेतकऱ्यांना किती लाभ व कशाच्या आधारावर देण्यात आला, उर्वरित लाभ केव्हा देण्यात येईल, शंभर टक्के नुकसान (Crop Damage) झाले तरी नुकसानभरपाई (Compensation) का देण्यात आली नाही.
याबाबत पीक विमा कंपनीच्या नरखेड तालुक्यातील प्रतिनिधीला विचारणा केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याचा आरोप माजी सभापती वसंत चांडक यांनी केला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजने (Crop Insurance Scheme) अंतर्गत नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकाचा विमा उतरला. या वर्षात अतिवृष्टी व सतत पाऊस पडत असल्यामुळे पिकांची नासाडी झाली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात नुकसान सहन करावे लागले.
शासनाकडून ॲपवर पेरा नोंद करण्याचे जाहीर झाले. तलाठ्याकडील पेरा पत्रकाचे काम शेतकऱ्यास करावे लागले.
विमा उतरविलेल्या शेतकऱ्यास ७२ तासांचे आत नुकसानीबाबत कंपनीस कळण्याकरिता टोल क्रमांक देण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी सूचना दिल्या. अनेकांना नोंद करता आली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
कृषी विभागांनी शेतकऱ्यांची नोंद व्हावी, याकरिता शेतकऱ्यांच्या सातबारा, आठ-अ, आधार कार्ड, पॉलिसी सत्यप्रत प्रमाणपत्र गोळा केले. विमा कंपनीकडून अंशकालीन कर्मचाऱ्यांनी तक्रारीनुसार काहीच शेतकऱ्यांचे पंचनामे केले.
पण प्रत्यक्षात मात्र विमा कंपनीने क्लेम फार्मवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेऊन माहितीचा स्वतःच भरणा केला. ही माहिती शेतकऱ्यास कळविण्यात आली नाही, असा आरोपही वसंत चांडक यांनी केला. जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे याबाबत मागणी नोंदविण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.