
लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) : लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी (Lakhimpur Kheri Voilance) मंगळवारी (ता. ६) एका न्यायालयाने केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Aashish Mishra) आणि अन्य १३ जणांवर आरोप निश्चित केले.
आशिष मिश्रा हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि त्याच्यावर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी लखीमपूर खेरी येथे चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या हत्येचा आरोप आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुनील कुमार वर्मा यांनी आरोप निश्चित केले.
पुढील सुनावणी १६ रोजी होणार आहे, असे जिल्हा सरकारी वकील अरविंद त्रिपाठी यांनी सांगितले. मिश्रासह १४ आरोपींवर आयपीसी कलम १४७ (दंगल), १४८ (प्राणघातक शस्त्रांसह दंगल), १४९ (सामान्य हेतूने गुन्हा करणे), ३२६ (विच्छेदन), ३०७ (खुनी हल्ला) असे आरोप आहेत. ३०२ (हत्या), १२० बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत आरोप निश्चितीसाठी पुरेसे कारण असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.