
Dhule News : फळबागांप्रमाणे (Orchard) सर्वच पिकांसाठी कृषी मजुरीचा समावेश रोजगार हमी योजनेत (Employment Guarantee) व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस तथा वसमार येथील माजी सरपंच गिरीश विश्वासराव नेरकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नेरकर यांनी पाठविले आहे.
ज्येष्ठ नेते, तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फळबाग लागवड व कृषी मजुरीचा समावेश रोजगार हमी योजनेत केला आहे. त्याचप्रमाणे इतर सर्व कृषी पिकांचाही समावेश रोजगार हमी योजनेत करण्यात यावा, कारण कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरीची आवश्यक असते.
हा व्यवसाय सध्या न परवडणारा होत चालला आहे. शिवाय शेती व्यवसाय नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच संकटात सापडत आहे. कधी कोरडा, तर ओला दुष्काळ या चक्रव्यूहात शेतकरी पूर्णपणे भरडत चालला आहे. शेतमालालाही योग्य दर मिळत नाही.
दुसरीकडे शेतीसाठीची मजुरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शेतकरी मेताकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना कुठलीही बँक योग्य वेळी कर्ज किंवा इतर कुठलीही मदत करत नाही. यामुळे हताश शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय अवलंबतात.
जर सर्वच पिकांना कृषी मजुरीचा समावेश रोजगार हमी योजनेत झाला तर शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. अंसघटित शेतकरी व शेतमजुरांना रोजगार मिळेल.
शिवाय काही प्रमाणात शेतकरी आत्महत्याही थांबतील. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी विनंतीही नेरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.