Agriculture Land : शेतजमीन हस्तांतरण प्रक्रिया होणार सुलभ

Salokha Yojana Maharashtra : ‘सलोखा योजना’ ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपआपसातील वाद मिटून सौख्य व सौहार्द वाढीला लागावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
Agriculture Land
Agriculture LandAgrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘सलोखा योजना’ ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपआपसातील वाद मिटून सौख्य व सौहार्द वाढीला लागावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतजमीन हस्तांतरण प्रक्रिया सुलभ होणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी व शेतजमीन धारकांनी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क रुपये १ हजार व नोंदणी शुल्क रुपये १ हजार असे नाममात्र शुल्क आकारण्याबाबत सवलत देण्याची ‘सलोखा योजना’ शासनाने ३ जानेवारी रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली आहे.

Agriculture Land
Salokha Yojana : सलोखा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ः जिल्हाधिकारी परदेशी

अशा आहेत सलोखा योजनेच्या अटी व शर्ती:

- सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाचा राहील.

- या योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असला पाहिजे.

- एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे व सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे.

- सलोखा योजनेंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग/सत्ताप्रकार, पुनर्वसन/ आदिवासी/कूळ आदी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.

Agriculture Land
Farmer Scheme : शेतकऱ्यांनी ‘सलोखा’ योजनेचा लाभ घ्यावा

- पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनींचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही.

- योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.

- अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही.

- सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदला-बदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.

- या योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com