
नगर : जल,जमीन व जंगल सांभाळणारा आदिवासी (Tribal Farmer) भिल्ल समाज हा खरा मालक असूनही आज तो भूमिहीन झाला असून, उदरनिर्वाहासाठी सातत्याने स्थलांतरित (Tribal Migration) होत आहे. आदिवासी शेतकरी (Tribal Farmer), शेतमजुरांना हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना संघर्ष करेल, असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.
नेवासा येथे आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिगेडतर्फे आदिवासी शेतकरी व शेतमजूर मेळावा झाला. अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. बन्सी सातपुते हे होते.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे नेते व राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड, विठ्ठल माळी, देविदास पवार, नारायण बर्डे, संजय पवार, त्रिंबक भदगले उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचा सातबारा झालाच पाहिजे. अनेक भूमिहीन आदिवासी बांधव आपले कुटुंब पोसण्यासाठी नदी,बंधारे व तलावांवर मच्छीमारी व्यवसाय करीत आहेत.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.