
Jalgaon News : खानदेशात ६ जुलैनंतर पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणीची आकडेवारी वाढली असून, ८५ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत.
धुळे, जळगाव व नंदुरबारात सुमारे १४ लाख हेक्टरवर पेरण्या अपेक्षित आहेत. जूनमध्ये पेरण्या पाऊस नसल्याने रखडल्या होत्या. पिके मोडून नव्याने पेरण्या करण्याची गरज फारशी पडली नाही.
परंतु पेरण्या उशिरा झाल्या आहेत. कोरडवाहू कापूस लागवड कमी असून, ही लागवड सुमारे सहा लाख हेक्टरवर खानदेशात झाली आहे. खानदेशात एकूण कापूस लागवड साडेआठ लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. सोयाबीनची पेरणीदेखील बऱ्यापैकी आहे. पण उडीद, मुगाची पेरणी कमी झाली आहे.
काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड टाळून सोयाबीनची पेरणी केली आहे. जोखीम घेऊन लवकर उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणांची पेरणी अनेकांनी केली आहे. खानदेशात पेरण्या ८५ टक्के क्षेत्रात पूर्ण झाल्या आहेत. पेरणीची आकडेवारी मागील आठवड्यात ७२ टक्के एवढी होती. ६ जुलैनंतर पाऊस बरसत आहे.
मध्यंतरी काही दिवस पावसाचा खंड होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वासहा लाख हेक्टरवर, धुळ्यात साडेतीन लाख आणि नंदुरबारात दोन लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. इतर पिकांच्या तुलनेत कोरडवाहू कापसाची लागवड अधिक आहे सोयाबीनची पेरणीदेखील अपेक्षेपेक्षा आहे.
कारण पेरणीचा कालावधी किंवा मुदत संपत असतानाच चांगला पाऊस झाला. तोपर्यंत अनेकांनी मका, कापसाची लागवड केली होती. पेरणी करतानाच रासायनिक खतेही सोयाबीन, मका पिकाला दिली आहेत.
तागाची पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. परंतु तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीच्या लाभक्षेत्रात पेरणी होईल. ही पेरणी पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते. पेरणीला गती आली आहे. परंतु १०० टक्के पेरणी यंदा होणार नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.