
Jalna News : ऐन मोसमात पावसाने दगा दिल्यामुळे पेरण्या लांबल्या. कशीबशी पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता बियाणे उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी येण्यास सुरू झाली आहे. ता. २४ जुलैपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या ७८ तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, पीक न उगवण्याचे कारण बोगस बियाणे आहे की कमी पर्जन्यमान असा पेच आता कृषी विभागासमोर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात यंदा मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर पडला. त्यामुळे ता.१५ जुलैपर्यंतही शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या नाही. त्यात अनेक शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता उपलब्ध पाण्यावर पेरण्या पूर्ण केल्या.
शिवाय पेरणी सुरू होण्यापूर्वीच बियाणांची टंचाईही निर्माण झाली होती. नामांकित कंपनीचे बियाणे बाजारात उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेवटी मिळेत ते बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी उरकली होती.
मात्र, आता बियाणे न उगवण्याच्या तक्रारी येण्यास सुरवात झाली. ता.२४ जुलैपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ७८ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी ७३ ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली आहे.
मात्र, एका तक्रारीचा अंतिम अहवाल दिलेला नाही. त्यामुळे हे बियाणे न उगवण्याचे कारण बोगस बियाणे आहे, की कमी पर्जन्यमानात पेरणी केल्याचे कारण आहे, याचा शोध कृषी विभागाला घेणे आहे.
सोयाबीनबाबत ता.२४ जुलैपर्यंत तालुकानिहाय स्थिती
तालुका प्राप्त तक्रारी क्षेत्र (हेक्टरमध्ये पाहणी
जालना १५ २७ १५
अंबड १५ १४.६ १५
बदनापूर १७ १६.६ १७
भोकरदन ०९ ४.६ ०६
घनसावंगी १५ २७ १५
जाफराबाद ०३ ३.६ ०३
मंठा ०६ ६.८ ०६
परतूर ०१ ०.८ ०१
एकूण ७८ ८३.२० ७३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.