Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ५० लघू प्रकल्प कोरडेठाक

Water Shortage : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी ५० प्रकल्प कोरडेठाक आहेत. एका मध्यम प्रकल्पातही पाण्याचा थेंब नाही.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी ५० प्रकल्प कोरडेठाक आहेत. एका मध्यम प्रकल्पातही पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे लघू आणि मध्यम अशा ३२० प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेल्याची स्थिती आहे. ऑगस्ट लोटला तरी पावसाने कृपाच केली नसल्याने पाणीसाठ्यांमध्ये वाढ होण्याऐवजी घट होत असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील ७४९ प्रकल्पापैकी कोरड्या पडलेल्या ५० प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७, बीडमधील सर्वाधिक २९, लातूरमधील २, धाराशीवमधील २० लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या ३२० लघू, मध्यम प्रकल्पामध्ये २२ मध्यम व २९८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

Water Crisis
Water Crisis : देशातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर

जोत्याखाली गेलेल्या २२ मध्यम प्रकल्पात छत्रपती संभाजीनगरमधील ४, जालना व लातूरमधील प्रत्येकी २, बीडमधील ६, धाराशीवमधील ७ व नांदेडमधील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या २९८ लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४७, जालना ४८, बीड ५९, लातूर ४५, धाराशीव ८६, नांदेड ३, परभणी जिल्ह्यातील १० लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

३६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा

मराठवाड्यातील ११ मोठ्या, ७५ मध्यम, ७४९ लघू प्रकल्पांसह गोदावरी नदीवरील १५ व तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये केवळ ३६. २१ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पात ४३ टक्‍के, मध्यम ७५ प्रकल्पात २१ टक्‍के, ७४९ लघू प्रकल्पात २२ टक्‍के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात ३७ टक्‍के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात उपलब्‌ध असलेल्या ३८ टक्‍के पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Water Crisis
Water Crisis : पश्चिम महाराष्ट्रात पाणीटंचाईत वाढ

माजलगाव प्रकल्पात केवळ १३ टक्‍के पाणी

मोठ्या प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पात केवळ १३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. धाराशीवमधील सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे जायकवाडी प्रकल्पात ३४ टक्‍के, येलदरी ६० टक्‍के, सिद्‌धेश्‌वर ४६ टक्‍के, मांजरा २४ टक्‍के, ऊर्ध्व पैनगंगा ६९ टक्‍के, निम्न तेरणा २७ टक्‍के, निम्न मनार ५३ टक्‍के,विष्णूपरी ८६ टक्‍के, निम्न दुधना २६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची स्थिती आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा

७५ मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पात १७ टक्‍के, जालन्यातील ७ प्रकल्पात २२ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पात १६ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पात २० टक्‍के, धाराशीवमधील १७ प्रकल्पात १३ टक्‍के, नांदेडमधील ९ प्रकल्पात ५१ टक्‍के, परभणीमधील २ प्रकल्पात १९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

लघू प्रकल्पातील पाणीसाठा

लघू ७४९ प्रकल्पांपैकी जालना जिल्ह्यातील लघू प्रकल्पांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ २ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमधील ९७ लघू प्रकल्पात ९ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पात ८ टक्‍के, लातूरमधील १३४ प्रकल्पात २३ टक्‍के, धाराशीवमधील २०६ प्रकल्पात ११ टक्‍के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ९२ टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पात १० टक्‍के तर हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पात शिल्लक असलेल्या ७८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com