
Irshalwadi Rescue Operation : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने आख्खं गाव गाढलं गेले. या दुर्घटनेनंतर दोन दिवसांपासून बचावकार्य सुरू असून यात मृतांचा आकडा २६ लोकांचा मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक अजून बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दोन दिवसांपूर्वीच तेथे दरड कोसळल्याने अवघे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले होते. ४५० लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये दुखाचा डोंगर कोसळला. यात काही लोकांनी कसाबसा आपला जीव वाचवला. पण १०० हून अधिक या ढिगाऱ्याखाली गाढले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू झाले. पण मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे मशीनरी घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. परंतु ४ एनडीआरएफच्या टीम आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. अनेक जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. मात्र दुर्दैवाने २६ लोकांचा मृत्यू झाला. तर अजूनही १०५ लोक बेपत्ता आहेत.
२२ मृतांमध्ये ११ स्त्रिया व ११ पुरुषांचा समावेश आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ११ जणांना प्रथमोपचार करुन सोडण्यात आलं आहे. ६ जखमींवर खालापूर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका जखमी रुग्णावर पनवेलच्या उपजिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तर तीन रुग्णांवर MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात भूस्खलन झालेल्या ईर्शाळवाडी गावाला भेट देणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.