
सोलापूर : सोलापूर, पुणे व नगर या जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये (Ujani Dam) जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदा परतीच्या पावसाचा (Rain) लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडलेला आहे. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही शंभर टक्याहून अधिक भरलेले आहे.
सध्या धरणात शंभर टक्के (१००.४५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
धरणाचा पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे ६ किलोमीटरहून अधिक रुंदी व १४० किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून आहेत.
यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडला. धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडण्यात आले आहे.
२५ जानेवारीपर्यंत शहरासाठी सुटणार पाणी
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आणखी काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. तत्पूर्वी, महापालिकेकडून पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र लाभक्षेत्र प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहे.
त्यानुसार सोलापूर शहरातील नागरिकांसाठी २० ते २५ जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. त्यानंतर पुढील दीड-दोन महिने शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.