Maharashtra Rain : पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; काही भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

Rain update : राज्यातील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rain Agrowon

Weather Update : राज्यात रब्बीची पेरणी आता वेगाने सुरु आहे. पण पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यातील काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Rain
Maharashtra Rain: पुढील पाच दिवस कोणत्या भागात पावसाचा अंदाज? राज्याच्या इतर भागात काय परिस्थिती राहू शकते?

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर रत्नागिरी जिल्ह्यात विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या म्हणजेच मंगळवारी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये विजा, ढगांच्या गडागडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच पुढील दोन दिवस या पाच जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com