
Vidarbha Weather Update : राज्यात पावसाने दडी मारली त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचा खंड अनेक ठिकाणी आता एक महिन्यांचा झाला. शेतकरी पावसाची वाट पाहता आहेत. पण अपवाद वगळता राज्यात पाऊसच नाही. त्यातच हवामान विभागानं राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, अशी शक्यता व्यक्त केली.
राज्यात आज सकाळपासून काही भागात ढगाळ वातावरण होते. पण जोरदार पावसाचाी नोंद नव्हती. तर बहुतांशी ठिकाणी उन्हाचा पारा वाढलेलाच होता. हवामान विभागाने आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तसच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यात ठिकठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात, असेही हवामान विभागाने म्हटले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.