Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाच्या खंडाची परिसीमा

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एक जून ते २१ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रदीर्घ खंड कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाले.
Kharif crop
Kharif cropAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एक जून ते २१ ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रदीर्घ खंड कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाले. धाराशिव जिल्ह्यात चार टप्प्यांत सर्वाधिक एकूण ४८ दिवस पावसाचा खंड पडला.

तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी दोन टप्प्यात एकूण २७ दिवसांचा खंड पडल्याचे पावसाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. सुरुवातीपासूनच पावसाची असलेली ही स्थिती मराठवाड्याची चिंता वाढविणारी अशीच आहे.

Kharif crop
Maharashtra IMD Alert : मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस?

साधारणतः २.५ मिलिमीटर पाऊस झाला की तो दिवस पावसाचा मोजला जातो. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान तीन वेळा अनुक्रमे १३, ९ व ७ दिवसाचे खंड नोंदल्या गेले. जालना जिल्ह्यात १ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान चार वेळा अनुक्रमे १०, १२, ९ व ७ असे दिवस मिळून ३८ दिवस पावसाचा खंड राहिला.

बीड जिल्ह्यात १ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान तीनवेळा अनुक्रमे १०,१२ व २० दिवस मिळून ४२ दिवस पावसाचा खंड राहिला. लातूर जिल्ह्यात १२ जून ते १९ ऑगस्टदरम्यान दोन वेळा अनुक्रमे १२ व २२ दिवस मिळून ३४ दिवस पावसाच्या खंडाची नोंद झाली. धाराशिव जिल्ह्यात १ जून ते २१ ऑगस्ट दरम्यान चार वेळा अनुक्रमे २४, ७, १२ व ७ मिळून सर्वाधिक ४८ दिवस पावसाचा खंड राहिला.

Kharif crop
Farmer Suicide : शेतकऱ्यांचा आत्महत्या रोखण्यासाठी मास्टर प्लॅन, मराठवाडा विभागीय आयुक्तांचा सरकारकडे प्रस्ताव

नांदेड जिल्ह्यात १२ जून ते १४ जून दरम्यान दोनवेळा अनुक्रमे १४ व १३ दिवस मिळून २७ दिवस पावसाचा खंड राहिला. परभणी जिल्ह्यात १ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान तीन वेळा अनुक्रमे १०, १२ व १७ दिवस मिळून ३९ दिवस पावसाचा खंड होता. हिंगोली जिल्ह्यात ६ जून ते १८ ऑगस्ट दरम्यान दोन वेळा अनुक्रमे १९ व १५ दिवस मिळून ३४ दिवस पावसाचा खंड नोंदल्या गेला आहे.

वार्षिक सरासरीच्या ५३.७ टक्के पाऊस

आठही जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ५३.७ टक्के पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामध्ये परभणी, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या सहा जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४० ते ४६ टक्के दरम्यानच पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७८.७ टक्के तरी हिंगोली जिल्ह्यात ६०.३ टक्के पाऊस झाला असे पावसाची आकडेवारी सांगते.

२१ दिवसात केवळ २८ टक्के पाऊस

दुसरीकडे ऑगस्ट महिन्यातील २१ दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ २८.२ टक्केच पाऊस झाल्याची स्थिती आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६.३ टक्के, जालना जिल्ह्यात २६.६ टक्के, बीडमध्ये १९.८ टक्के, लातूरमध्ये केवळ १३.१ टक्के  धाराशिवमध्ये १६.३ टक्के, नांदेडमध्ये ४४.२ टक्के, परभणी मध्ये २७.५ टक्के तर हिंगोली ते ३७.१ टक्के इतकाच पाऊस झाल्याचे चित्र आहे.

आमच्या परिसरात पाऊसच नाही ज्यांच्याकडे थोडा बहुत आणि उपलब्ध आहे ते पीक जगण्यासाठी धडपड करत आहे. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांची पिकं करपणं सुरू झाली. अलीकडच्या दोन दिवसात झालेली भुरभुर पिकासाठी पोषक नाहीच.
- गणपतराव चव्हाण, यशवंतवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com