
डॉ. रामचंद्र साबळे
Weather Forecast: महाराष्ट्रावर आजपासून शनिवार (ता. २३ फेब्रुवारी ते १ मार्च)पर्यंत हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. या आठवड्यात कमाल व किमान तापमानात चढ-उतार जाणवतील. मात्र थंडीचे प्रमाण अत्यंत कमी राहील. सकाळी व पहाटे हवामान थंड राहील. मात्र दुपारी कमाल तापमानात वाढ होऊन हवामान उष्ण राहील. सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा वेग साधारणच राहील.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उद्या (ता.२४)पासून गुरुवार (ता. २७) पर्यंत काही भागांत हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांतही काही प्रमाणात हवामान ढगाळ राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून व आग्नेयेकडून राहण्याची शक्यता आहे. इतर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्य व ईशान्येकडून राहील.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ २१ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २५ अंश सेल्सिअस आहे. त्यावरून ‘ला-निना’चा प्रभाव अद्याप आहे. त्यामुळे पूर्वमोसमी व मोसमी पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे. हिंदी महासागराच्या व अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस आहे. ही स्थिती देखील पावसासाठी अनुकूल आहे.
कोकण :
कमाल तापमान रायगड जिल्ह्यात व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७२ ते ७४ टक्के, पालघर व रायगड जिल्ह्यांत ४० ते ४८ टक्के, तर ठाणे जिल्ह्यात ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६० ते ६४ टक्के, रायगड जिल्ह्यात ४४ टक्के, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी ५ कि.मी., रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी. आणि पालघर जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस आणि नाशिक जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ६४ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ४४ टक्के राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत २५ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ३४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात ताशी ४ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
मराठवाडा :
कमाल तापमान धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. दुपारी हवामान उष्ण व कोरडे राहील. लातूर, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. मात्र जालना जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ६५ टक्के, धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के राहील. लातूर व बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४८ टक्के, तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३२ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यांत ३० ते ३६ टक्के, तर लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २६ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील.
पश्चिम विदर्भ :
कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला व अमरावती जिल्ह्यांत ६३ ते ६५ टक्के, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ४७ ते ५३ टक्के राहील. अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य आणि वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ :
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर नागपूर व वर्धा जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५६ ते ५८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ११ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर नागपूर जिल्ह्यात वायव्येकडून राहील.
पूर्व विदर्भ :
कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहणे शक्य आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात ७६ टक्के, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३२ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १४ कि.मी राहील. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र :
कमाल तापमान सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत ७२ ते ७५ टक्के, तर सांगली, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ५४ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ६ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला :
- उन्हाळी भुईमूग, मूग, मटकी, बाजरी या पिकांची पेरणी बागायती क्षेत्रात करावी.
- मधुमक्याची पेरणी करावी.
- वांगी, टोमॅटो, मिरची रोपांची लागण करावी.
- हरभरा पीक काढणीस आले असल्यास काढणी करून मळणी करावी.
- तापमानात वाढ होत असल्याने जनावरांना निवाऱ्याची सोय करावी. गरजेनुसार पाणी द्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.