
Maharashtra Weather: महाराष्ट्रावर आज व उद्या (ता.१३ व १४) हवेचा दाब १००६ ते १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. मंगळवार ते शनिवार (ता. १५ ते १९) या काळात हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल इतका कमी राहील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत, तर हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती होईल.त्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत हवामान मोठ्या प्रमाणात ढगाळ राहून अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल. पावसाचे प्रमाण ६ ते ७ मि.मी पर्यंत असण्याची शक्यता राहील.
या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यांत तापमानात वाढ होईल. कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान उष्ण व कोरडे राहील. पश्चिम व मध्य विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग २० ते २५ कि.मी.पर्यंत वाढणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. उष्ण लहरी, उष्णतेच्या लाटा जाणवतील. या पुढील काळात तीव्र उष्णता जाणवेल.
पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील इक्वॅडोरजवळ २६ अंश सेल्सिअस, तर पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला-निना’चा सौम्य प्रभाव जाणवेल. त्यामुळे काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता अधिक राहील.
कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि पालघर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ८२ टक्के, तर उर्वरित पालघर, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ७२ ते ७८ टक्के राहील.
ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६१ ते ६८ टक्के, तर सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ कि.मी. इतका राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून आणि रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. सर्व जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ६१ टक्के, जळगाव जिल्ह्यात ५९ टक्के आणि नाशिक जिल्ह्यात ३८ टक्के राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ११ ते १६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, तर बीड, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. जालना व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर धाराशिव जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर हिंगोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील.
जालना, छत्रपती संभाजीनगर व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व हिंगोली जिल्ह्यांत ६४ ते ६५ टक्के, तर लातूर व परभणी जिल्ह्यांत ५१ ते ५९ टक्के राहील. नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४८ टक्के, तर बीड जिल्ह्यात ४२ टक्के आणि जालना जिल्ह्यात ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशीव व बीड जिल्ह्यांत २६ ते २८ टक्के, परभणी जिल्ह्यात २५ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांत ११ ते १६ टक्के इतकी कमी राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात ५० टक्के, तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४५ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ३० टक्के, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत २२ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १६ ते १८ कि.मी., तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यात ताशी २० ते २८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ३७ टक्के, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ४० ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात ताशी २४ कि.मी., तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत १६ ते १८ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० ते ३५ टक्के, तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ४४ ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १६ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ९ कि.मी., तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ताशी ११ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ५५ टक्के, सातारा जिल्ह्यात ६२ टक्के, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ७६ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ८० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्यात २२ टक्के, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत १२ ते १५ टक्के इतकी कमी राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत १२ ते १३ कि.मी. राहील. उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
कृषी सल्ला
काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
तापमानात वाढ होत असल्याने शेतातील कामे सकाळी लवकर किंवा दुपारनंतर करावीत.
जनावरांना व कुक्कुट पक्ष्यांना दिवसातून ४ ते ५ वेळा स्वच्छ पाणी उपलब्ध करावे.
परिपक्व आंबा फळांची काढणी सकाळी लवकर करून आंबे सावलीत ठेवावेत.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.