कांदा पिकासाठी अहिल्यानगर जिल्ह्याची विशेष ओळख आहे. येथील शेतकऱ्यांना शेतीमाल खरेदी-विक्री करणे सोपे व्हावे यासाठी १९५४ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना अहिल्यानगर शहराशेजारी झाली. आज ती शहराच्या मध्यभागी आहे. मुख्य बाजार समितीत महत्त्वाचे योगदान असलेल्या माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे तर नेप्ती येथील उपबाजार समितीला ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले आहे. किसानसिंग गोविंदसिंग परदेशी हे बाजार समितीचे पहिले अध्यक्ष तर १९५६ मध्ये गणपतराव भाऊराव काळे हे पहिले उपाध्यक्ष ठरले. बाजार समितीच्या विकास, विस्तारात आमदार शिवाजी कर्डिले यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले आहे. एकवीस संचालक मंडळ असलेल्या या बाजार समितीचे सध्या भाऊसाहेब बोठे अध्यक्ष, रभाजी सूळ उपाध्यक्ष आहेत. बाजार समितीच्या सुरुवातीपासूनच येथे भुसार मालासह कांद्याचे लिलाव होतात. कांद्याची आवक वाढू लागली तशी जागा अपुरी पडू लागली. मग २०११ मध्ये शहरापासून बाहेर असलेल्या ७९ एकर क्षेत्रावरील विस्तीर्ण नेप्ती उपबाजारात (ता. अहिल्यानगर) लिलाव सुरू झाले. दिवसेंदिवस बाजाराचा लौकिक वाढत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.