
नांदेड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा (National Food Security) अभियानांतर्गत गळीत धान्य अभियान (सामान्य) या योजनेतील शेतकर्यांनी खरेदी केलेल्या विविध कृषी अवजारे (Agriculture Implements) व सिंचन साहित्याचे एक कोटींच्यावर अनूदान (Irrigation Subsidy) थकले होते. याबाबत ॲग्रोवनमध्ये वृत्त (Agrowon Impact) होताच शासनाकडून जिल्ह्यातील २७७ शेतकर्यांचे एक कोटी १९ लाख रुपयांचे अनूदान प्राप्त झाले आहे.
शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन शेतकऱ्यांना पेरणीयंत्र रोटावेटर, मळणीयंत्र, कलटीवेटर, दालमील, पेरणीयंत्र, विद्युत मोटार, पाईप आदी कृषी अवजारांसह कृषी सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.
यासाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करतात. यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांच्या निवड झाल्यानंतर त्यांना खरेदीसाठी पूर्वसमंती दिली जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीत धान्य अभियान (सामान्य) या योजनेत शेतकऱ्यांना अवजारे खरेदी केल्यानंतर मागील सहा महिन्यापासून दोनशेपेक्षा अधीक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते.
याबाबत ॲग्रोवनमध्ये कृषी अवजारांचे अनूदान थकल्याचे वृत्त प्रकाशीत केले होते. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कृषी विभागाकडे विचारणा केली होती. तसेच राज्यस्तरावरुनही याची नोंद घेवून नुकतीच जिल्ह्यातील २७७ शेतकऱ्यांना एक कोटी दोन लाख रुपयांचे अनूदान मिळाले. यानंतर लगेच संबधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनूदान जमा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.