Sustainable Farming: मागील काही वर्षांपासून पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. पावसाळा कधी लवकर तर कधी उशिराने सुरू होणे, त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, कमी वेळात अधिक पाऊस, दोन पावसांत मोठे खंड पडताहेत. हिवाळा हा ऋतू तर जवळपास गायबच झाल्यात जमा आहे. उशिराने म्हणजे जानेवारी शेवटी किंवा फेब्रुवारीमध्ये थोड्या कालावधीसाठी तीव्र थंडीच्या लाटा येताहेत. .उन्हाळ्यात चढत असलेला तापमानाचा पारा पिके-मानवाबरोबर संपूर्ण जीवसृष्टीला असह्य होत आहे. एकंदरीत काय तर हवामान बदलाचा हा काळ असून, त्यात नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा शेती क्षेत्राला बसत आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूंवर आधारीत आपल्या राज्यात, देशात बसलेली शेतीची घडी हवामान बदलाच्या काळात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हवामान अनुकूल शेती हीच राष्ट्रीय प्राथमिकता असायला हवी, असा इशारा ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशन’ने (फायफा) प्रकाशित केलेल्या अहवालात दिला आहे..ज्या तापमानवाढीमुळे हवामान बदलते आहे, ते कमी करण्यासाठी प्राधान्य दिलेच पाहिजे. परंतु हे काम एकट्यादुकट्याचे नाही. त्यात वैयक्तिक ते देश पातळीवर एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे दुसरा पर्याय उरतो तो या बदलत्या हवामानास अनुकूल शेतीचा! या पर्यायाचा शेतकरी तत्काळ अवलंब करू शकतात, त्यामुळे काही अंशी तरी आपली शेती, पिके वाचण्यास हातभार लागू शकतो..Indian Agriculture: शेतीचे सामर्थ्य.हवामान अनुकूल शेतीसाठी राज्यात ‘पोकरा’ प्रकल्प टप्पा दुसरा राबविला जात आहे. परंतु हा प्रकल्प काही गावांपुरता मर्यादित असून, हवामान अनुकूल शेतीचे तंत्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. हवामान अनुकूल शेतीमध्ये केवळ उत्पादनवाढ हा उद्देश नाही तर मातीचे आरोग्यदेखील चांगले राहिले पाहिजे. त्यासाठी मशागतीपासून ते पीक हाती येईपर्यंत शेती पद्धतीत व्यापक बदल करावे लागणार आहेत..हवामान बदलाचा सामना करणाऱ्या मशागती तसेच शेती पद्धती, माती आणि पाणी व्यवस्थापन, शाश्वत कृषी तंत्रज्ञान यावर महत्त्वपूर्ण संशोधन झाले पाहिजे. त्यानुसारच्या शिफारशी शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. अलीकडच्या काळात शून्य मशागत तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हवामानाच्या अंदाजानुसार कमी-अधिक पाऊसमानात तग धरणारे, कमी-अधिक कालावधीत येणारी वाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हवीत..Climate Change Crisis: ‘एल निनो’पलीकडचे हवामान संकट.त्यांच्या लागवडीबाबत योग्य ते मार्गदर्शन कृषी विभागाकडून झाले पाहिजे. लहरी हवामानात शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी आणखी एक चांगला उपाय म्हणजे एकल पिकाची लागवड न करता आंतरपीक, मिश्रपीक पद्धतीचा अवलंब व्हायला हवा. लागवडीमध्ये बेड पद्धत ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या दोन्ही परिस्थितीमध्ये पिके वाचविण्यासाठी उपयुक्त ठरतो..ज्या जमिनींची जलधारण क्षमता कमी आहे तेथे मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय करणे गरजेचे आहे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यासाठी संवर्धित शेती, नैसर्गिक शेती आणि हरित आच्छादन करणे गरजेचे आहे..संरक्षित शेती हा पण मर्यादित क्षेत्रासाठी चांगला पर्याय आहे. हवामान बदलात पीक पोषण आणि पीक संरक्षणात एकात्मिक व्यवस्थापन अधिक फायदेशीर ठरते. शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी पिकांना विम्याचा आधार द्यायला हवा. राज्यात ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ चार महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आले असून, ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.