
Solapur News : जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मंगळवारी (ता. १) उणे साठ्यातून अधिक साठ्यात आले. त्यामुळे सोलापूरसह नगर, पुणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही, पण धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्याच्या विसर्गावर हा साठा वाढला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून धरण उणे पातळीत होते. वरचेवर त्या पातळीत वाढ होत गेली. त्यातच पुन्हा पावसाने ओढ दिल्याने धरणाच्या पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणी उणे ३६.१९ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. त्यानंतर प्रत्यक्षात नऊ जुलै पाऊस सुरू झाला. शिवाय पुणे भागात तो बऱ्यापैकी झाला. त्यामुळे तिकडील अतिरिक्त पाणी उजनीकडे सोडण्यास सुरुवात झाली. तेव्हा उजनीची पाणी पातळी हळूहळू वाढू लागली आणि अखेरीस
आज उजनी धरणाची पाणीपातळी उणेतून अधिकमध्ये आली. मंगळवारच्या (ता. १) आकडेवारीनुसार धरणाची एकूण पाणीपातळी ४९१.०३५ मीटरपर्यंत राहिली, तर धरणातील एकूण साठा ६३.६९ टीएमसी राहिला. तर उपयुक्तसाठा ०.४ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारीही एक टक्क्याच्या घरात पोहोचली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.