पुणे विभागात टंचाई वाढतेय; ६४ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरु

पुणे : विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहे. या चार जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमधील ५४ गावे, १८० वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल ६४ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त भागातील सुमारे ८९ हजार नागरिक आणि ५ हजार ७०० जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरु झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी ४९ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुणे  : विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहे. या चार जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमधील ५४ गावे, १८० वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल ६४ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त भागातील सुमारे ८९ हजार नागरिक आणि ५ हजार ७०० जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरु झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी ४९ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागात यंदा पाणीटंचाई कमी असल्याचे चित्र असले तरी, दुर्गम तालुके, पश्चिमेकडील तालुक्यांतील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई वाढत आहे. जिल्ह्यातील १३ पैकी ६ तालुक्यांमधील २४ गावे, १०७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून, ४० हजार ९०५ लोकसंख्येला ३३ टॅंकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. आंबेगाव, भोर, हवेली, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात पाणीटंचाई वाढली आहे. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक झळा बसत आहेत.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण, सातारा, कराड या सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाई वाढू लागली आहे. जिल्ह्यात १३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यातील जत आणि शिराळा तालुक्यात पाणीटंचाई वाढू लागल्याने टँकर सुरू करावे लागले आहेत. या दोन तालुक्यातील ७ गावे, ३६ वाड्यांमधील सुमारे ९ हजार ७९३ नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ७ टॅंकर धावत आहेत. यात जतमधील ३ गावे, ३६ वाड्यांना आणि शिराळामधील ४ गावांना एका टॅंकरद्वारे पाणी दिले जात आहे.

उन्हाचा चटका वाढू लागताच सोलापूर जिल्ह्यातही पाणी टंचाईचा जाणवण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील ४ तालुक्यांमध्ये पिण्याची टंचाई वाढल्याने ११ गावे, २० वाड्यांमधील २३ हजार ८५२ नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ११ टॅंकर सुरु आहेत. माढा, करमाळा, बार्शी, सोलापूर तालुक्यात पाणीटंचाई वाढू लागली आहे.  

विभागातील पाणी टंचाईची स्थिती
जिल्हा गावे वाड्या टँकर
पुणे २४ १०७ ३३
सातारा १८ ३० १३
सांगली ३६
सोलापूर ११ २० ११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com