खानदेशात `जलयुक्त` भागातही पाणीटंचाईची झळ

`जलयुक्त` भागातही पाणीटंचाईची झळ
`जलयुक्त` भागातही पाणीटंचाईची झळ

जळगाव : खानदेशात ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून मागील दोन वर्षे प्रभावी काम झाले, त्या गावांमध्येही पाणीटंचाई वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा व जामनेरात, धुळे जिल्ह्यात शिंदखेडामध्ये, नंदुरबारात नंदुरबार व शहादा तालुक्‍यातील पूर्व भागात ही समस्या आहे. 

अमळनेरातील पश्‍चिम भागातील अनेक गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झाली. त्यात जानवे, आंचलवाडी, मंगरूळ समावेश होता. पारोळामध्येही जिराळी, इंधवे, बहादरपूर भागात कामे घेतली. धुळे तालुक्‍यात तामसवाडी, कौठळ, लामकानी, जापी, धनूर, मोहाडी भागांतही ती झाली. पांझरानदीकाठीदेखील पाणीटंचाई आहे. शहादा तालुक्‍यातील जयनगर व परिसरात गावात पाणीटंचाई नसली, तरी पुढे विहिरींची पाणी पातळी घटेल. कहाटूळ भागात समस्या वाढू लागली आहे. जलयुक्तचे काम झाले, त्या गावांत अपेक्षित पाऊस झाला नाही. पाणीच मुरले नाही, यामुळे टंचाई वाढली.  

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास आठ टॅंकर सुरू आहेत. शहादा पूर्व, नंदुरबार पूर्व भागात स्थिती बिकट आहे. नंदुरबारमधील नाशिंदा, खोंडामळी, पळाशी, बामडोद, पळाशी भागात टंचाई आहे. कोळदा येथे खासगी विहिरींवरून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. दुसरा हंगाम नसल्याने चाराटंचाई वाढली आहे. दुधाळ पशुधन जगवावे कसे, हा प्रश्‍न ग्रामस्थांसमोर आहे. जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नवापूर व नंदुरबार हे तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com