पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकला ः राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्यातील सद्यःस्थिती पाहता निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यावा. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून लोकांना आधार देणे, त्यांची घरे उभारणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी श्री. ठाकरे यांनी केली आहे. 

श्री. ठाकरे म्हणाले, की भाजप सरकारला आणि मंत्र्यांना जनतेशी काहीही देणे घेणे नाही. त्यांचे २३०, २५० जागा येणार असे आकडेही ठरले आहेत. तुम्ही पुरात अडका किंवा दुष्काळात लटका आम्हाला काय करायचेय, अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. सध्याची पूरस्थिती पाहता तेथील नागरिकांचा प्रश्न गंभीर आहे. पावसाचे पाणी ओसरल्यानंतरही तेथील जनजीवन सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात. त्यासाठी मी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com