
सोलापूर : जिल्ह्यातील गोकुळ शुगर-धोत्री, लोकमंगल- भंडारकवठे, लोकमंगल-बीबीदारफळ यांनी गतवर्षीच्या एफआरपीची बिले अद्यापही दिली नाहीत. आज हंगाम संपून आठ महिने उलटले, पण पैसे दिले नाहीत, यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अन्यथा सोमवारी (ता.७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला.
यासंबंधी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासनाचा साखर कायदा पायदळी तुडवून या कारखान्यांनी ऊस उत्पादकांचा संसार उघडण्यावर आणला आहे. विशेष म्हणजे साखर सहसंचालकही यामध्ये कारवाई करत नाहीत, याबाबत आश्चर्य वाटते.
कोरोनाच्या व लॅाकडाऊनच्या काळात शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आला आहे, अशा वाईट परिस्थितीमध्ये पुन्हा कारखानदार आणि प्रशासनाच्या भूमिकेमध्ये त्याची कोंडी होत आहे. यामध्ये प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कारवाई करावी, अन्यथा आम्हाला शांत बसता येणार नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.