

कोल्हापूर: साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करून ३३०० रुपये प्रतिक्विंटल करण्यास मंत्री गटाने मंजूरी दिली असली तरी कारखानदारांनी यात अजून दोनशे रुपये वाढ करण्याची गरज व्यक्त केली आहे. कारखानदारांनी ३१०० रुपयांऐवजी ३५०० रुपये साखरेचा किमान विक्री दर करावा अशी मागणी केली होती. या पार्श्र्वभूमीवर केंद्राने २०० रुपयांची वाढ केली. आता विक्री दर वाढल्यानंतर या प्रमाणात बँकेकडून उचल जादा मिळण्याची शक्यता आहे. या बाबत कारखानदारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असले तरी एफआरपी देण्यासाठी ३५०० रुपये दरच गरजेचा होता, असा सूर कारखानदारांतून व्यक्त होत आहे. सध्या साखरेला मिळणाऱ्या दरानुसार एफआरपी देताना टनास तीनशे ते चारशे रुपये कमी पडतात. सध्याच्या वाढीमुळे शंभर ते दीडशे रुपयांची तूट भरुन निघणार असली तरी ही वाढ पुरेसी ठरणार नसल्याची प्रतिक्रीया कारखानदरांची आहे. कोविडचे संकट सुरु झाल्यापासून साखर विक्री आव्हानात्मक बनली. एप्रिल व मे महिन्यांत जास्तीत जास्त साखर विक्री होते. परंतू यंदा ही साखर विक्री झाली नाही. केंद्राने दिलेले कोटेही कारखान्यांना पूर्ण करता आले नाहीत. मे च्या अखेरीस अनलॉकची प्रक्रीया सुरु झाल्यानंतर विक्रीत काहीशी वाढ होत जून अखेरपर्यंत परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागली. पण आता पुन्हा कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने मोठी शहरे पुन्हा लॉकडाउनच्या स्थितीत आहेत. याचा फटका पुन्हा साखरेवर आधारित उद्योगावर होणार आहे. यामुळे जूलैच्या उत्तरार्धानंतर साखर विक्रीत पुन्हा अडथळे येणार आहे. विक्रीच्या अडथळ्यांचे चक्र सुरुच राहिल्याने केंद्राने पुनर्विचार करुन साखरेची किंमत ३५०० रुपयापर्यंत वाढवावी, अशी मागणी कारखानदार प्रतिनिधींनी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.