औरंगाबाद : निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के खाली करून बाधित शेतकऱ्यांची शेतजमीन भूसंपादन व मोजणी करून मोबदला द्यावा, या मागणीसाठी वांजोळा (जि. जालना) सह इतर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मंगळवार (ता.२५) पासून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या व ढोलताशा आंदोलन सुरू केले आहे.
निम्न दुधना बाधित शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, सहा वर्षांपासून आंदोलने, पाठपुरावा करूनही इतिवृत्त प्रस्तावाला सही साठी अडीच महिने लागतात. तर मंजुरी कधी मिळणार?, पाणी कधी कमी होणार, पाणी खाली सोडल्या शिवाय मोजणी करता येणार नाही. आम्ही तोपर्यंत कशी उपजीविका करायची? आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतीवर घेतलेले कर्ज कसे फेडायचे, बँकेच्या नोटिशीला काय उत्तर द्यायचे, कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
भूसपांदनाचा निर्णय लागत नाही, तो पर्यंत ७ जून नंतरचा २०२२ चा जलसाठा ५० टक्केच्या वरती धरू नये. अन्यथा कार्यकारी संचालकांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संचालकांनी जमिनीची मोजणी सुरू करावी, यासाठी शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. सायंकाळपर्यंत आंदोलन कायम होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.