
वर्धा ः बोर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे केली होती. मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानुसार लवकरच धरणातून पाणी नदीत सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. गावालगतच्या भागातून नदी वाहत असताना तिला ही कोरड पडली. परिणामी, नागरिकांसह जनावरांची ससेहोलपट होत आहे. सेलू तालुक्यातील अनेक गावांत पिणाच्या पाण्यासाठी नागरिकांसह गुराढोरांना दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात बोर नदीवर धरण असून, धरणात सध्या १६.१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे; परंतु धरणातून पाणी सोडण्यात न आल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढीस लागली. बोर नदीच्या काठावर सेलू शहरासह घोराड, हिंगणी व अनेक गावे आहेत. या सर्व गावांना पाणी समस्येची झळ बसत आहे. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था या गावातील ग्रामस्थांची झाली आहे. जनावरांसाठी पाणी नसल्याने जनावरे विकण्यावर पशुपालकांचा भर आहे. काही जनावरे पाण्याअभावी मृत्यूच्या दारात आहे. या सर्वांची दखल घेत बोर धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली. विदर्भ पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता अविनाश सुर्वे यांनी ही मागणी मान्य करीत लवकरच पाणी सोडण्याची ग्वाही दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.