
सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जारी केले.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सहा जुलै रोजी धर्मपुरी येथून जिल्ह्यात प्रवेश करून नातेपुते येथे मुक्कामी आहे. संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी सात जुलै रोजी अकलूज येथे प्रवेश करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरकडे येते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज, श्रीपूर, बोरगाव, तोंडले-बोंडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव वाखरीमार्गे पंढरपुरात येईल.
या पालख्यांसोबत वारकरी चालत येतात, त्याचबरोबर वाहने असतात. त्यामुळे नातेपुते ते पंढरपूर मार्गावर पालखी सोहळ्यादरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल, असे पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
हा आदेश शासकीय वाहने, वारी कालावधीसाठी आवश्यक सेवा बजावणाऱ्या सर्व विभागांच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही. हा आदेश तीन जुलैपासून १४ जुलैपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत अमलात राहील, असे पाटील यांनी आदेशात नमूद केले.
वाहतुकीचे बदल याप्रमाणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.