सेंद्रिय काजू उत्पादकांना शेतकरी कंपनीचा दिलासा

कोरोना टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील सेंद्रिय काजू उत्पादक शेतकरी गटाला रत्नागिरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने दिलासा दिला. काजू बीला चांगला हमीभाव देतानाच सुमारे २० टन काजू बी प्रक्रिया करून निर्यात केली जाणार आहे.
cashaw nut
cashaw nut
Published on
Updated on

रत्नागिरी ः कोरोना टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील सेंद्रिय काजू उत्पादक शेतकरी गटाला रत्नागिरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने दिलासा दिला. काजू बीला चांगला हमीभाव देतानाच सुमारे २० टन काजू बी प्रक्रिया करून निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे सेंद्रिय काजू उत्पादक, बागायतदारांना कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शाश्वत शेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.  यंदा काजू हंगामावर कोरोनाच्या टाळेबंदीचे सावट होते. त्यामुळे सेंद्रिय काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू तोडणी करून साठवणूक केली. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सेंद्रिय उत्पादनांमध्ये देशपातळीवर काम करणऱ्या ओरिसा येथील एसवर्क सीनर्जिक ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर करार केला. खरेदीदार निश्चित झाल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला होता. रत्नागिरी तालुक्यातील खानू येथील इको फ्रेंडली फार्मर्स ग्रुप आणि लांजा तालुक्यातील माजळ येथील पंचमुखी सेंद्रिय शेती गट यासह वैयक्तिक सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांकडून स्थानिक गावठी, वेंगुर्ला काजू बीची खरेदी सुरू केली. कंपनीचे अधिकारी त्रिवेणी (दिल्ली), विनोद राऊत (पुणे) यांच्यामार्फत ओरिसा राज्यातील सुप्रसिद्ध कॅश्यू इंडस्ट्रीज या सेंद्रिय प्रमाणपत्र उच्च दर्जाधारक कंपनीत सर्व प्रक्रिया करण्यात आली.  सेंद्रिय उत्पादित विषमुक्त काजू शेतकऱ्यांनी तोडणीनंतर चांगली सुकवून ७ टक्के आर्द्रता ठेवली. त्यामुळे गावठी स्थानिक काजू प्रतिकिलो ९२ रुपये तर वेंगुर्ला काजूला १०२ रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला. याच कालावधीत नियमित बाजारातील काजू खरेदी दरापेक्षा हा दर दुप्पट होता. त्यामुळे बी खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. पुढील हंगामात सर्व सेंद्रीय प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांना याचा लाभ देणार आहोत. राज्य शासनाच्या कृषी विभाग आत्माअंतर्गत सर्व सेंद्रिय शेती गटांचे सहभागिता हमी पद्धत केंद्र सरकार प्रमाणीकरण झाले असल्यामुळे निर्यात प्रक्रियेत अडथळा आला नाही. आता सेंद्रिय शेती उत्पादकांना रत्नागिरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून एक शाश्वत खरेदीची हमी घेऊन निश्चित बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ओरिसा येथे त्या काजू बी वर प्रक्रिया करण्यात येणार आहे. तिथून प्रक्रिया युक्त काजू बी जर्मनीला पाठवण्यात येणार आहे.  पारंपरिक शेतकरी सेंद्रिय शेतीचा अवलंब करत आहेत. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून मिळाल्यामुळे उच्च दर्जाचे काजू बी उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले. त्याची विक्री होऊन उत्तम दरही मिळत आहेत. भविष्यात आम्हाला सेंद्रिय शेतीतून विविध पिके, उत्पादने घेण्याची प्रेरणा मिळत आहे. यामध्ये रत्नागिरी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष संदीप कांबळे यांच्यासह व सर्व संचालक मंडळाने एक शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.  - संतोष लोटणकर, सचिव, माजळ पंचमुखी सेंद्रिय गट, लांजा   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com