खरीप हंगामाच्या सुरुवातीला खतांच्या दरवाढीचा शॉक

कोरोनाचे संकट, सततचा लॉकडाउन, पडलेले बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदर तोट्यात असताना शासनाने रासायनिक खतांच्या वाढवलेल्या किमती, या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या आहेत.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला खतांच्या दरवाढीचा शॉक At the beginning of the kharif season Shock of fertilizer price hike
खरीप हंगामाच्या सुरुवातीला खतांच्या दरवाढीचा शॉक At the beginning of the kharif season Shock of fertilizer price hike

आर्णी, जि. यवतमाळ : कोरोनाचे संकट, सततचा लॉकडाउन, पडलेले बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती, बेमोसमी पाऊस यामुळे शेती अगोदर तोट्यात असताना शासनाने रासायनिक खतांच्या वाढवलेल्या किमती, या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या आहेत.   खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे शेतात रासायनिक खतांचा वापर करावा की, नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. रासायनिक खतांचा वापर केला नाही, तर पीक जोमात येणार नसल्याची भीती देखील आहे. शासनाने रासायनिक खत आणि त्या संदर्भातील कंपन्या यांच्यावरील शासन अनुदान काढून घेतल्यामुळे किमती वाढल्याचे बोलले जात आहे. शेतीच्या मशागतीचे कामे सुरू झाली आहेत. काही दिवसांत मृग नक्षत्र सुरू होणार आहे. मृग नक्षत्र सुरू झाले की, खरीप हंगामातील नगदी पिकांची लागवड सुरू होते. पीक जोमाने वाढावे, यासाठी लागवडीनंतर अवघ्या चार दिवसांत रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागते. सुरुवातीपासून रासायनिक खत दिल्यावर पीक जोमात वाढायला सुरुवात होते. त्यामुळे खत महत्त्वाचे असते. खतांच्या वाढलेल्या किमती आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे शेतीची मशागत आणि पिकासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांचे डोकेदुखी ठरत आहे. भरघोस पीक घेण्यासाठी येणारा खर्च वाढून त्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करणार असलेले सरकार शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुप्पट करीत आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शेती उपयोगी साधने यांच्यावरील कर कमी करून सवलत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च वाढवणार आहे. वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती तोट्यात जात आहे.

प्रतिक्रिया मागील ३२ वर्षांपासून कृषी केंद्रचालक आहे. या काळात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचे भाव वाढले नाहीत. या वर्षी रासायनिक खतांचे वाढलेले भाव शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहेत. खतांची भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांना पिकांना खत टाकणेच अवघड होणार आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम दिसून येणार आहे. गजानन बुक्कावार, गजानन कृषी केंद्र चालक, आर्णी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com