दोंडाईचा, जि.धुळे : प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेकडे लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्षचं 

दोंडाईचा, जि.धुळे : वीस वर्षांपासून मंजूर प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी रास्ता रोको, धरणे आंदोलनेही झाली.परंतु सर्वांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याची खंत आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
Dondaicha, Dist. Dhule: People's representatives continue to ignore Prakasha-Burai Upsa Irrigation Scheme
Dondaicha, Dist. Dhule: People's representatives continue to ignore Prakasha-Burai Upsa Irrigation Scheme

दोंडाईचा, जि.धुळे : वीस वर्षांपासून मंजूर प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी रास्ता रोको, धरणे आंदोलनेही झाली. सत्ताधारी, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत योजनेचा विषय पोचविला. परंतु सर्वांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याची खंत आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. योजनेसाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींना बोलून शासन स्तरावर आवाज उठवण्यासाठी पाणी परिषद घेणार असल्याचे आंदोलनकर्ते माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांनी सांगितले. 

सन २०१७-१८ मध्ये प्रकाशा- बुराई योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे. भरीव निधी द्यावा. कामाची गती वाढवावी आदि मागण्यांबाबत मालपूर पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सतीश पाटील यांनी दोंडाईचा-नंदुरबार महामार्गावर धावडे (ता शिंदखेडा) येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर अमरावती मध्यम प्रकल्पावर भजन आंदोलन केले गेले. दरम्यानच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मंत्री जयंत पाटील, आमदार गिरीश महाजन आदि राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन योजना लवकर पूर्ण होण्यासाठी थेट दिल्लीपर्यंत योजनेचा विषय ठेवल्याचे पाटील यांनी सांगितले. कायमस्वरूपी दुष्काळी शिंदखेडा तालुक्याचा भाग सिंचनाखाली येणार आहे. राज्य सरकार असो की केंद्र सरकार यांनी कोणतीही दखल घेतली नाही. गेल्या चार वर्षांपासून फक्त चित्र निर्माण केल्याचाही आरोप आंदोलक तथा माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांनी केला.  योजनेसाठी अजून किती वर्षे वाट पाहावी लागेल. सरकारने डोळ्याला पट्टी बांधली आहे का0 गल्लीपासून दिल्लीत सरकार असणाऱ्यांनी विशेष लक्ष घालून ठोस निधी आणला पाहिजे होता. खासदार-आमदार, मंत्री यांच्या मतदारसंघातीलच शेतकऱ्यांच्या शेत शिवार भिजणार आहे. अधिवेशनात विधीमंडळात, संसदेत जातात तर हा प्रश्‍न मांडून नये का0 मांडला असेल तर आपले वजन पडले नाही का असा प्रश्न आहे.  - रवींद्र धनगर, माजी सरपंच, घोटाणे, ( ता. नंदुरबार)  सन २०१८ मध्ये नंदुरबार रस्त्यावर कार्ली फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. पाइपलाइनच्या टप्पा एक दोनचे काम पूर्ण करून जून २०१९ पर्यंत काम पूर्ण करून आसाणे तलावात पाणी टाकण्याचे लेखी पत्राद्वारे संबंधित विभागाने आश्र्वासन दिले होते. परंतु तेही पूर्ण झाले नाही. आता जलजीवन मिशन अंतर्गत पंधरा गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. त्यास पाण्याचा सोर्स नाही.  - चंद्रकांत पाटील, सरपंच आसाणे (जि.नंदुरबार)   

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com