
Parbhani News : परभणी जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराच्या संसर्गात वाढ झाली आहे. या आजारांमुळे जनावरे दगाविण्याचे प्रमाण गतवर्षीच्या (२०२२) तुलनेत अधिक आहे. यंदा (२०२३) १ एप्रिल ते मंगळवार (ता. २९)पर्यंत लम्पी स्कीन आजारामुळे ४८६ जनावरे दगावली आहेत. गतवर्षी (२०२२) ऑगस्ट ते मार्च २०२३ या ८ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३८३ जनावरे दगावली होती. वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आजवर २९३ वासरे दगावली आहेत अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी दिली.
डॉ. नेमाडे म्हणाले, की यंदा १ एप्रिलपासून मंगळवार (ता. २९)पर्यंत जिल्ह्यातील २ हजार ३५१ जनावरांना ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या आजाराचे जिल्ह्यात ६५२ सक्रिय पशुरुग्ण आहे. गंगाखेड, पालम, परभणी तालुक्यांत लम्पी स्कीनच्या पशू रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यातुलेत पूर्णा, जिंतूर तालुक्यांत सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी आहे.
उपचारानंतर बरी झालेल्या जनावरांमध्ये गायी ५७२ व बैल ६४१ असे एकूण १ हजार २१३ जनावरांचा समावेश आहे. मंगळवार (ता. २९)पर्यंत एकूण ४८६ जनावरे दगावली आहेत. त्यात सर्वाधिक २९३ वासरे आहेत, तसेच ६४ गायी व १२९ बैल यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार ८०० जनारांचे लसीकरण करण्या आले आहे. जिल्ह्यात दुसऱ्यांदा लसीकरण पूर्ण झाले. वासरांमध्ये मृत्यू प्रमाण अधिक आहे. उपचारांसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. पशुपालकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे. उपचार सुरू असलेल्या जनावरांची काळजी घ्यावी. गोठा गोचीड, गोमाशी मुक्त ठेवावा. लसीकरण करून घ्यावे, असे डॉ. नामदेव आघाव यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.