
Washi Market News : वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात सध्या संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेला संत्र्यांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. परिणामी, भावातही घसरण झाली आहे.
नागपुरी संत्र्यांचा हंगाम संपल्यानंतर जानेवारी महिन्यापासून फळ बाजारात राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून संत्री येण्यास सुरुवात होत असते. यंदा संत्र्यांचा हंगाम चांगला राहिला असून, आता अंतिम टप्प्यात आला आहे.
त्यामुळे शेतकरी आपला माल मोठ्या प्रमाणात फळ बाजारात पाठवत आहेत. परिणामी, आवक वाढल्याने भावही घसरले आहेत. मंगळवारी (ता. ४) रोजी एपीएमसीच्या फळ बाजारात ९,२८१ क्विंटल आवक झाली. ही महिनाभरातील मोठी आवक असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
आवक वाढल्याने घाऊक बाजारातील भाव ४० ते ६० रुपयांवरून २५ ते ५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. संत्र्यांच्या हा शेवटचा टप्पा असून, पुढील १५ ते २० दिवसच आवक होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.