
देशातील बाजारात कापसाचे भाव वाढलेलेच आहेत. वायद्यांमध्ये झालेली सुधारणा चांगील आहे. बाजारात समित्यांमध्ये चालू आठवड्यात कापूस दरात ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली. तर वायद्यांनी ६० हजार ५०० रुपयांवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापूस वायद्यांमध्ये दोन टक्क्यांची वाढ होऊन ८७ सेंटचा टप्पा पार केला होता. कापूस दरातील सुधारणा टिकून राहण्याचा पोषक स्थिती असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात शुक्रवारी मोठी नरमाई आली होती. सोयाबीन दर पुन्हा १३.०६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंडने ३८८ डाॅलरचा टप्पा गाठला होता. आज देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव सरासरी ५० रुपयांनी कमी झाले होते. आज सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीन भावावर आणखी काही दिवस दबाव कायम राहू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
राज्यातील बाजारात सध्या गाजराची आवक खपूच कमी आहे. पावसामुळे गाजर पिकाला फटका बसला होता. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा कमी दिसतो. त्यामुळे राज्यातील बाजारांमध्ये गाजराच्या भावात मोठी वाढ झाली. सध्या गाजराला प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते २ हजार २०० रुपये भाव मिळतोय. गाजराचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
बाजारात सध्या ज्वारीला चांगला भाव मिळत आहे. यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. तर दुसरीकेड ज्वारीला मागणी वाढत आहेत. परिणामी ज्वारीचे भाव तेजीत आहेत. सध्या ज्वारीला व्हरायटीनुसार भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. ज्वारीची मागणी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज असून भावही तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्य्क्त केला.
देशातील बाजारात गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झाली. चालू वर्षात आतापर्यंत म्हणजेच १ जानेवारी ते १० ऑगस्टपर्यंत देशातील गव्हाचे भाव जवपास ४८ टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या गव्हाला किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३२ रुपयांचा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात गव्हाचे भाव वाढल्याने सरकारची डोकेदुखी वाढली. काही महत्वाच्या राज्यांमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुका असल्याने सरकार गव्हाच्या भावाविषयी गंभीर आहे. सरकार गव्हाच्या भावावाढीसाठी साठेबाजीला जबाबदार धरतंय. पण जाणकारांच्या मते, भाववाढीला साठेबाजी दबाबदार नाही. तसेच बाजारात गव्हाची झालेली आवक गेल्या १७ वर्षांच्या सरासरी पातळीवर आहे.
कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते जुलै या काळात देशातली एकूण उत्पादनापैकी १९ टक्के गव्हाची आवक झाली होती. म्हणजेच यंदा १ हजार १२७ लाख टन गहू उत्पादन झाले. तर बाजारात आवक २१३ लाख टनांची झाली. गेल्यावर्षीही एकूण उत्पादनाच्या १९ टक्केच माल या काळात बाजारात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव, हमीभावातील वाढ आणि गव्हाची मागणी यामुळे दरात वाढ झाली, असे जाणकारांनी सांगितले. सध्या बाजारात गव्हाला सरासरी २ हजार ५०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाच्या दरातील वाढ पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासक सांगत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.