सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार पाहायला मिळाले होते. देशातील बाजारात जवळपास २ लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी आले होते. तर सोयाबीनला बाजारात सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपये भाव मिळाला. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ८०० रुपयांपासून ते ५ हजार १०० रुपायंपर्यंत होते. मागील आठवडाभरात भाव या पातळीच्या दरम्यान टिकून आहेत. बाजारातील आवक काहीशी कमी झालेली आहे. नव्या वर्षात सोयाबीन बाजाराची सुरुवातही याच दरम्यान होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .तुरीचा भाव दबावातचतुरीसाठी २०२५ हे वर्ष संकटाचे गेले. तुरीचा भाव गेले वर्षभर हमीभावाच्या पुढे सरकलाच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. नव्या वर्षातही तूर बाजाराची सुरुवात दबावानेच होणार आहे. देशातील उत्पादन कमी होणार असले तरी आयात सुरु आहे. याचा दबावा दरावर राहील. सध्या तूर बाजारात ६ हजार ६०० ते ७ हजार रुपयाने विकली जात आहे. आयात तुरीचा दरही याचदरम्यान दिसत आहे. तुरीची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये वाढेल. त्यामुळे दरावर दबाव राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Chiaseed Price: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चियासीडला २२ हजारांचा उच्चांकी दर.कापूस दरात सुधारणादेशातील बाजारात कापसाचे भाव मागील ३ दिवसांमध्ये काही ठिकाणी १०० रुपयांपर्यंत सुधारले आहेत. सीसीआयची खरेदी ५० लाख गाठींचा टप्पा पार करून पुढे सरकली आहे. बाजारात रोज दीड ते दोन लाख गाठींची आवक होत आहे. मात्र यापैकी बहुतांशी कापूस सीसीआय खरेदी करत आहे. यामुळे खुल्या बाजारात व्यापारी आणि जिनिंगला कमी कापूस मिळत आहे. याचा आधार कापसाच्या भावाला मिळत आहे. खुल्या बाजारात सध्या कापूस ७ हजार ४०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. सरकारने मुक्त कापूस आयातीला मुदतवाढ दिली नाही तर कापसाच्या दरात सुधाऱणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Banana Price: केळी दरात सुधारणा नाहीच.गुळाच्या दरावर दबावगुळाला काहीसा उठाव कमी झाल्याचा परिणाम दरावर दिसून आला. मागील काही दिवसांमध्ये पुढे गुळाची मागणी कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे गुळाचे उत्पादनही वाढत आहे. सध्या गुळाला गुणवत्तेनुसार सरासरी ३ हजार ८०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील गुळाची आवकही चांगली आहे. साखरेचे दरही नरमले आहेत. याचाही परिणाम गुळाच्या दरावर दिसत आहे. गुळाच्या भावात पुढील काळातही चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज गूळ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..तीळाला मागणीमकरसंक्रांतीच्या तोंडावर तिळाला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील तिळाची आवक मर्यादीत असल्याचे व्यापारी सांगत आहे. सध्या मुंबई बाजारातच आवक १०० क्विंटलपेक्षा अधिक आहे. तर अमरावती, जालना आणि अकोल बाजारातील आवक ५० क्विंटलच्या दरम्यान राहत आहे. तर दुसरीकडे मागणी वाढत आहे. त्यामुळे तिळाच्या दराही सुधारणा दिसून आली आहे. सध्या राज्यातील बाजारात तिळाला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजारांचा भाव मिळत आहे. मुंबई मार्केटला सर्वाधिक १७ हजारांचा भाव मिळत आहे. तिळाचे दर पुढील २ आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.