Market Bulletin: कांदा दर स्थिरकांद्याच्या भावात मागील ३ आठवड्यांपासून काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. मात्र दर एका पातळीच्या भोवती फिरत आहेत. देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशात कांद्याची आवक सुरु आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर दबावात आहेत. कांद्याच्या दरात मागील आठवड्यात १०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसले. सध्या कांद्याला सरासरी १२०० ते १४०० रुपये दर मिळाला. चांगल्या गुणवत्तेचा कांदा १६०० ते १७०० रुपयाने विकला जात आहे. कांद्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या दरातील चढ उतारही कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .कापूस दर दबावातचदेशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे. देशात जवळपास ८ हजार ते ९ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. यंदा भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाही. त्यामुळे कापसाची आवक सध्या कमी आहे. तर कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र, अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काचा देशातून होणाऱ्या कापड निर्यातीवर होत आहे. त्यामुळे कापसाचे भाव स्थिर राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Cotton Import : कापसाची आयात वाढल्याने साठा वाढला; नव्या हंगामात बाजारात येणार.उडदाचे भाव कायमदेशातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे. मात्र तरीही उडदाचे भाव दबावात आहेत. उडदाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजारांचा भाव मिळत आहे. उडादाची बाजारातील आवक कमी असली तरी आयात माल जास्त आहे. आयात उडादाचा स्टाॅक देशात आहे. त्याचा दबाव दरावर असल्याचे प्रक्रियादार सांगत आहेत. यंदा देशातील उडदाची लागवड गेल्यावर्षीप्रमाणे झाल्याचे दिसत आहे. तसेच देशातील अनेक भागात पिकाची स्थितीही चांगली आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवा उडीद पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात येईल. त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत..India Rice Export : बांगलादेशमुळे १४ टक्क्यांनी वाढले तांदळाचे भाव; भारतातून वाढली तांदूळ निर्यात.लसणाचे भाव स्थिरराज्यातील बाजारात लसणाची आवक चांगली सुरु आहे. त्यामुळे दरातही स्थिरता दिसून आली. परराज्यातूनही लसूण विक्रीसाठी राज्यात येत आहेत. परिणामी लसणाचा पुरवठा चांगला दिसत आहे. लसणाची आवक पुणे, मंबई, नाशिक, नागपूर अशा मोठ्या बाजारात जास्त दिसत आहे. तर सरासरी दरपातळी ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. पुढील काही आठवडे लसणाची आवक स्थिर राहू शकते. मात्र पहिल्या पावसानंतर लागवड केलेला लसूण बाजारात आल्यानंतर आवक सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर आणखी दबाव येऊ शकतो, असे व्यापारी सांगत आहेत..हिरवी मिरची टिकूनबाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहेत. त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळत आहे. हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळत आहे. सध्या राज्यात पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई बाजारातच मिरचीची आवक काहीशी अधिक दिसत आहे. तर मुंबई बाजारात मिरचीला जास्त दर आहे. सरासरी ५ हजारांच्या दरम्यान विकली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.