Market Bulletin: गव्हाचा बाजार स्थिरदेशातील बाजारात गव्हाचे भाव स्थिर आहेत. देशात यंदा गव्हाचा पुरवठा चांगला होता. तसेच सरकार गव्हाच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने गव्हावरील स्टाॅक लिमिटची मर्यादा कमी केली. तसेच यंदा सरकारने खरेदीही चांगली केली आहे. परिणामी गव्हाचे दर स्थिरावले आहेत. मागील ३ आठवड्यांपासून गव्हाचे दर २ हजार ६०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. गव्हाची बाजारातील आवक मर्यादीत असली तरी सरकारच्या धोरणांचा दबाव गहू बाजारावर आहे. सध्या गव्हाला सणांमुळे मागणी वाढत आहे. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा अपेक्षित असल्याचे जाणकारांनी सांगितले. .उडदाचा बाजार दबावातचदेशातील बाजारात उडदाचे भाव दबावातच आहेत. गव्हाला बाजारात सध्या ६ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. काही बाजारांमध्ये नव्या उडदाची आवक सुरु झाली. तरी नव्या मालाच ओलवा जास्त आहे. त्यामुळे दर कमीच आहेत. जुना उडीद ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पावसाने उडीद पिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादनाला फटका बसत आहे. मात्र आयातही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याचा दबाव दरावर येत आहे. पुढील काही आठवडे दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Flower Market: शीतगृहात शेवंतीच्या फुलांचे मूल्यवर्धन.कारली दर टिकूनराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून कारल्याची आवक मर्यादीत दिसत आहे. मागील ३ आठवड्यांमध्ये राज्यातील बहुतांशी भागांमध्ये भाजीपाला पिकाला पावसाचा फटका बसला. याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. परिणामी बाजारातील आवक कमी दिसत आहे. याचा आधार दराला आहे. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही आठवडे बाजारातील कारली आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारल्याचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत..Banana Market: केळीच्या शिवार खरेदीत बाजार समित्यांकडून शुल्क वसुली.हिरवी मिरचीला उठावमिरची पिकाला पावसाचा फटका बसत आहे. मागील ३ आठवडे राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पाऊस झाला. या पावसाने मिरची पिकाला मोठा फटका बसला. परिणामी बाजारातील आवक कमी झाली. याचा आधार हिरवी मिरची दराला मिळत आहे. सध्या मिरची बाजारात २५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही आठवडे बाजारतील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला मिळू शकतो, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..मसूरचे दर टिकूनदेशातली बाजारात सध्या मसूरचे दर टिकून आहेत. देशातील मसूरचे उत्पादन कमी झाले होते. सरकारने मसूरची आयात खुली केल्याने आयात वाढलेली आहे. त्यामुळे देशात पुरवठा चांगला झाला. यामुळे दरावर याचा परिणाम दिसून येत आहे. मसूरचे दर सध्या ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर मसूरचा हमीभाव ६ हजार ७०० रुपये आहे. सर्वच कडधान्याचे भाव दबावात असल्याने मसूरही स्थिर आहे. मसूरचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, अशा अंदाज मसूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.