Market Bulletin: मक्याचा बाजारभाव स्थिरमक्याचा भाव मागील काही महिन्यांपासून स्थिर दिसत आहे. मागील दोन वर्षे मक्याला इथेनाॅलमुळे चांगला भाव मिळाला होता. मात्र यंदा इथेनाॅलसाठी ऊस आणि तांदूळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मक्याला गेली दोन वर्षे ज्या प्रमाणात उठाव मिळाला आणि त्याचा आधार दराला मिळाला ही परिस्थिती यंदा दिसत नाही. मक्याचा भाव यंदा सुरुवापासूनच २१०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान राहीला. देशातील काही बाजारांमध्ये नवा मकाही दाखल झाला आहे. या नव्या मालात ओलावा जास्त होता. त्यामुळे दर अगदी १४०० रुपयांपासून मिळत आहे. देशात यंदा मक्याची लागवड वाढली. त्यामुळे उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे. याचा दबाव मक्याच्या दरावर राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. .कांद्यामुळे शेतकरी अडचणीतदेशातील बाजारात कांद्याचे भाव दबावातच आहेत. यामुळे शेतकरीही अडचणीत आले आहेत. बाजारात सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. कांद्याला सरासरी १ हजार ते १२०० रुपयांच्या दरम्यान बहुतांशी बाजारात दर मिळत आहे. बाजारातली कांद्याची आवक सध्या चांगली आहे. त्यामुळे दरावर दबाव आला आहे. निर्यातीसाठीही कांद्याला जास्त उठाव मिळत नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. बाजारातील कांद्याची आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. .Banana Rate: केळी दरावर दबाव वाढला.कारली दर टिकूनकारल्याची बाजारातील आवक मर्यादीतच आहे. तर दुसरीकडे कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये कारल्याची आवक घटल्याचे व्यापारी सांगत आहेत. कारली पिकालाही पावसाचा चांगलाच दणका बसला. अनेक भागात पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. बाजारातील आवक कमी असल्याचा दराला आधार मिळत आहे. कारल्याला बाजारात सध्या ३ हजार ते ३५०० रुपये दर मिळत आहेत. कारल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादतच राहण्याचा अंदाज आहे. मात्र, उठाव चांगला राहील. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..Agriculture Challenges: ‘कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळू द्या, आम्हाला पण जगू द्या’.केळीला उठावबाजारात सध्या केळीला चांगला उठाव आहे. नवरात्रीच्या उपवासामुळे केळीला मागणी वाढली. दुसरीकडे पावसामुळे राज्यातील बाजारात सध्या केळीची आवक कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. नांदेड आणि खानदेश भागात पावसाचा पिकालाही फटका बसला. काही ठिकाणी केळीची गुणवत्ताही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे बाजारात सध्या केळीची आवक कमीच दिसत आहे. मात्र दरही कमी आहेत. सध्या केळी १४०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. केळीला बाजारात पुढील काही आठवडे चांगला उठाव राहणार आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांंनी व्यक्त केला..तुरीतील मंदी कायमदेशातील बाजारता तुरीचे भाव मंदीतच आहेत. तुरीच्या डाळीला सणासुदीमुळे चांगला उठाव आहे. तर दुसरीकडे चुरीचा पुरवठाही चांगला आहे. यामुळे देशातील उत्पादन कमी राहूनही तुरीच्या दराला याचा आधार मिळाला नाही. तुरीचे भाव मागील काही महिन्यांपासून दबावातच आहेत. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. तसेच आयात खुली आहे. पुढील ६ महिने देशात तुरीची आवक खुली राहणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात देशात तुरीची आयात होऊन दरावर दबाव राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.