Market Bulletin: सोयाबीन दर स्थिरनव्या वर्षाच्या पहिल्याच दिवस सोयाबीनचे भाव स्थिरावले होते. सोयाबीनच्या दरात मागील आठवडाभरात काहीसे चढ उतार दिसून आले. मात्र आज आवक आण दरही स्थिर दिसले. बाजारातील आवक १ लाख ७० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. तर बाजारातील दर ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये होते. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .हरभरा दर दबावातचहरभऱ्याचा बाजारात मागील कोही दिवसांपासून दबावातच आहे. हरभऱ्याची बाजारातील आवक मर्यादीत आहे. मात्र देशात पुरवठा असल्याने दरपातळी कमी आहे. सध्या देशातील बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याला मागणी आहे. मात्र आयातीचा दबाव आहे. सरकारने आयातीवर केवळ १० टक्के शुल्क लावले आहे. देशात दरात वाढ झाल्यानंतर आयातही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर काही आठवडे दबाव राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Organic Sugar Export: सेंद्रिय साखरेच्या निर्यातीला परवानगी.आले दराला आधारराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आल्याचे दर टिकून आहेत. बाजारातील आल्याची आवक सरासरीपेक्षा कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे आल्याला उठाव टिकून आहे. याचा आधार दराला मिळत आहे. सध्या आले बाजारात सरासरी ४ हजार ते ५ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. तर गुणवत्तेच्या मालाला कमाल ६ हजारांपर्यंतही काही ठिकाणी दर मिळत आहे. आल्याची आवक पुढील काही दिवस मर्यादीतच राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: तुरीला काय भाव मिळाला ?सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार, कापूस दरात सुधारणा, गुळाच्या दरावर दबाव, तीळाला मागणी.हळदीचे दर टिकूनदेशातील बाजारात हळदीचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे देशात आणि निर्यातीसाठी हळदीला उठाव आहे. याचा आधार हळद दराला मिळत आहे. सध्या देशात हळद सरासरी १५ हजार ते १७ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. तर काही बाजारांमध्ये गुणवत्तेच्या हळदीला उचांकी २० हजारांचाही भाव मिळत आहे. हळदीची यंदा लागवड वाढली. मात्र पावसाचा फटका पिकाला बसला. यामुळे उत्पादनात घट राहण्याची शक्यता आहे. नव्या मालाची बाजारातील आवक वाढेपर्यंत दर टिकून राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..संत्री आवक कमीचराज्यातील बाजारात संत्र्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे नागपुरी संत्र्याला उठाव चांगला आहे. याचा आधार दराला मिळत आहे. यंदा संत्र्याचे उत्पादनही कमी आहे. मालाची गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे सध्या बाजारात सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयाने माल विकला जात आहे. मुंबई बाजारात ७ हजारांपर्यंतही भाव मिळत आहे. संत्र्याचे उत्पादन कमी असल्याने पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तसेच गुणवत्तेच्या मालाची टंचाई आहे. यामुळे संत्र्यांचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.