सोयाबीन दरावर दबाव राज्यातील सोयाबीन काढणी वेगात सुरु आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढू लागली आहे. परंतु बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमीच भाव मिळत आहे. राज्यातील प्रमुख बाजारात सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपये दर मिळत आहे. यंदा उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज होता. परंतु पावसामुळे सोयाबीन पिकांला मोठा फटका बसला. त्यामुळे सोयाबीनच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे. त्याचा परिणाम दरावर होत आहे. पुढील दोन आठवडे सोयाबीनची आवक वाढणार आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर पुढील काळातही हमीभावाच्या खालीच राहतील, असे जाणकारांनी सांगितले. तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे..गवार तेजीतराज्यातील प्रमुख बाजारात गवारची आवक कमी आहे. त्यामुळे गवारच्या भावात तेजी आहे. गवार उत्पादक भागातही बाजारात १०० क्विंटलपेक्षाही आवक कमी आहे. कमी आवकेमुळे गवारला उठाव आहे. प्रमुख बाजारात गवारला सरासरी ७ हजार ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. पावसामुळे भाजीपाला पिकाला तडाखा बसला. तसेच कीडरोगांमुळे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमीच आहे. पुढील काही आठवडे आवाक स्थिर राहील, त्यामुळे गवार दरातील तेजी आणखी काही आठवडे टिकून राहील, अशी शक्यता व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत..Banana Price: खानदेशात केळीच्या दरात घट.कांदा दर कमीचराज्यातील बाजारात कांद्याचे भाव कमीच आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याला मागणी येऊन दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दरावरील दबाव कायम आहे. कांदापट्ट्यात पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाला फटका बसला आहे. त्यात आता दरही कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी वाढली आहे. त्यामुळे दरावर दबाव आहे. प्रमुख कांदा बाजारात सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही आठवडे आवक कायम राहू शकते. त्यामुळे दरात काहीसे चढ-उतार राहतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे..Agrowon Podcast: केळीचे दर स्थिर, ज्वारीचे दर कायम, शेवगा तेजीत, हिरव्या मिरचीला उठाव तर गव्हाला मागणीचा आधार.आल्याचे दर टिकूनराज्यातील बाजारात आल्याचे दर मागील दोन आठवड्यापासून स्थिर आहेत. आल्याची आवक मर्यादित आहे. परंतु मागणी कायम असल्याने उठाव आहे. दिवाळीची मागणी चांगली आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. सध्या आल्याला बाजारात सरासरी ४ हजार ४ हजार ५०० रुपये मिळत आहे. पिकाला कीड-रोगांचा प्रादुर्भावाचा मोठा फटका बसला आहे. आल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे. तर उठाव मात्र चांगला राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे आल्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी दिला आहे..तूर दर मंदीतचकेंद्र सरकारच्या शुल्क मुक्त कडधान्य आयातीच्या धोरणामुळे तूर बाजारावर दबाव कायम आहे. मागील दोन वर्षांपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. यंदाही तुरीला हमीभावापेक्षा कमीच दर मिळाला. दिवाळी सणामुळे तुरीला मागणी आहे. परंतु सरकारच्या आयात धोरणामुळे तुरीच्या दराला आधार मिळाला नाही. त्यामुळे तूर उत्पादक अडचणीत आहेत. सध्या बाजारात तुरीची आवक कमीच आहे. यंदा उत्पादनही कमी आहे. त्यामुळे दर तेजीत येतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत होते. परंतु सरकारच्या धोरणामुळे देशात तुरीचा साठा तयार झाला आहे. त्यामुळे सध्या तूर दर दबावात आहे. राज्यातील बाजारात सरासरी ५ हजार ८०० ते ६ हजार रुपयांनी तूर विकली जात आहे. पुढील काही आठवडे ही स्थिती राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.