Market Bulletin: सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. सोयापेंडचे भाव मागील दोन दिवसांमध्ये २०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या भावावरही काहीसा दबाव दिसत आहे. सोयाबीनचे खरेदीचे भाव प्रक्रिया प्लांट्सनी ५ हजार ४५० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयाने विकले जात आहे. सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र काही प्रमाणात पॅनिक सेलिंग दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात पुढील काही दिवस काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस बाजार स्थिरकापसाचे भाव मागील काही दिवसांपासून महीभावाच्या दरम्यान स्थिर दिसत आहेत. सीसीआयची खरेदी सुरु असल्याने हमीभावाचा आधार तयार झाल आहे. तसेच सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केले नाही. त्यामुळेही दर टिकून आहेत. सध्या कापूस बाजारात ७ हजार ६०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. त्यामुळे कापूस बाजारात पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान स्थिर दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Banana Price: खानदेशात केळी दरात सुधारणा.हरभरा दबावातदेशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढत आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. मागील आठवडाभरात हरभऱ्याच्या सरासरी भावात २०० रुपयांपर्यंत घट दिसून आली आहे. यंदा देशातील हरभरा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यंदा हरभरा लागवड वाढली आणि वातावरणही पोषक होते. यामुळे उत्पादन वाढीसाठी पोषक स्थिती आहे. बाजारातील आवक वाढत असल्याने हरभरा सध्या ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काही दिवस हरभरा भाव दबावातच राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Cotton Price Drop: कापसाचे दर पुन्हा घटल्याने शेतकरी चिंतेत.डाळिंब तेजीतराज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे डाळिंबाच्या भावात वाढ दिसून आली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत चालू महीन्यातील आवक काही प्रमाणात कमी झालेली आहे. याचा परिणाम भावावरही झाला आहे. सध्या बाजारात डाळिंब प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले जात आहे. तर कमाल भाव १६ हजारांपर्यंतही मिळत आहे. डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहू भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला आहे. .टोमॅटो बाजारात चढ उतारटोमॅटोच्या भावात काही बाजारांमध्ये चढ उतार दिसून येत आहे. आवकेनुसार भावात २०० रुपयांपर्यंत बदल होत आहेत. पुणे, मुंबई, नारायणगाव आणि नाशिक या बाजारांमधील आवक काहीशी अधिक असली तरी मागील दोन दिवसांमध्ये दरपातळी काहीशी स्थिरावली आहे. सध्या टोमॅटो या बाजारांमध्ये १४०० रुपयांपासून ते १८०० रुपयांपर्यंत सरासरी भावाने विकला जात आहे. तर कमाल भाव २ हजारांवर पोचला आहे. टोमॅटोला उठाव चांगला आहे. यामुळे टोमॅटोची भावपातळी काही दिवस यादरम्यान दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.