Market Bulletin: कारली दर नरमलेराज्यातील बाजारात कारलीची आवक काहीशी वाढली आहे. राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये आवक जास्त दिसत आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक बाजारांमध्येच कारल्याची जास्त आवक आहे. इतर बाजारांमधील आवकही वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. कारल्याचा भाव मागील महीनाभरातच क्विंटलमागे १ हजार ते १ हजार ५०० रुपयाने कमी झाला. सध्या करलीला सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. त्यामुळे दरही चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. .डाळिंब तेजीतच राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून डाळिंबाची आवक वाढली. मात्र बाजारात येणाऱ्या मालामध्ये डागी मालाचे प्रमाण अधिक आहे. आजही बाजारात गुणवत्तापूर्ण डाळिंब कमी प्रमाणात वि्क्रीसाठी येत आहे. त्यामुळे गुणवत्तापर्ण मालाचे भाव जास्त आहेत. डागी मालाला सध्या २ हजारांपासून ते ५ हजारांपर्यंत गुणत्तेप्रमाणे दर मिळत आहे. तर गुणवत्तापूर्ण डाळिंब आजही बाजारात ७ हजार ते ११ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारातील गुणवत्तापूर्ण डाळिंबाची आवक मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला राहील. त्यामुळे डाळिंबातील तेजी टिकून राहील, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .Khangaon Vegetable SubMarket: खानगाव नजीक उपबाजार आवारात मिरचीची विक्रमी आवक.मका बाजार टिकूनमक्याचा बाजार रब्बीतील मालाची आवक झाल्यापासून स्थिरावला आहे. देशात गेल्यावर्षभरातील तिन्ही हंगामात मक्याचे उत्पादन वाढले आहे. तसेच चालू खरिपातही मक्याची लागवड वाढली आहे. याचा दबाव दरावर येत आहे. तसेच मक्याच्या दरवाढीला मागील २ वर्षांमध्ये इथेनाॅलमुळे चांगलाच आधार मिळाला होता. परंतु यंदा इथेनाॅलसाठी आता तांदूळ आणि उसाचा पर्याय असणार आहे. त्यामुळे मक्याचे दर स्थिरावले आहेत. सध्या मक्याचे दर २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळात मक्याच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात. मात्र यंदा मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. .Betel Leave Rate: खाऊच्या पानांचे दर टिकून.बाजरीचे दर स्थिरदेशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून बाजरीचे दर स्थिर आहेत. बाजारीचे उत्पादन चालू वर्षी तीनही हंगाममात वाढल्याचे एकूण अंदाजावरून दिसत आहे. त्यामुळे बाजारातील बाजरीची आवक चांगली आहे. बाजारीला सध्या बाजारात सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. बाजारीची बाजारातील आवक कमी आहे. बाजारीला उठावही चांगला आहे. पुढील २ महिन्यात खरिपातील बाजारीची बाजारात आवक सुरु होईल. त्यामुळे पुरवठा पुन्हा वाढणार आहे. परिणामी बाजाराचे दर खरिपातील आवक सुरु होईपर्यंत स्थिर दिसू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला. .टोमॅटो दर टिकूनटोमॅटोच्या दरात काहीसे चढ उतार दिसत असले तरी सरासरी भावपातळी दोन आठवड्यांपासून टिकून आहे. बाजारातील आवक मध्यंतरी वाढली होती. परंतु पावसामुळे आवकेवर पुन्हा परिणाम झाला होता. परिणामी टोमॅटोच्या दरात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. सध्या बाजारात टोमॅटो ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी विकला जात आहे. मुंबई बाजारात आज सर्वाधिक ४ हजार ३०० रुपेय दर मिळाला. तर पुणे मार्केट सरासरी २ हजार ५०० रुपये राहीले. सर्वात मोठ्या नारायणगाव बाजारात ३ हजारांचा दर होता. पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.