Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon

Market Bulletin : ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादक भागात पूर येऊन पिकाचे नुकसान झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात वाढ झाली होती. ही वाढ शुक्रवारी टिकून राहीली. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १२.१६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते.

तर सोयापेंड ३७३ डाॅलरवर होते. देशातही आज प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव ४८०० रुपयांपर्यंत वाढवले होते. तर बाजार समित्यांमधील भावापातळीही काहीशी वाढून ४३०० ते ४६०० रुपयांच्या दरम्यान पोचली होती. सोयाबीनच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते, असा अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७७ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५७ हजार ६६० रुपये प्रतिखंडीवर होते. तर देशातील बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून टिकून दिसते.

त्यामुळे बाजार समित्यांमधील भावपातळी ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातीबंद उठवल्यानंतर कांद्याच्या भावात क्विंटलमागं ५०० ते ८०० रुपयांची वाढ झाली होती. कांद्याची बाजारातील आवक मात्र स्थिरा राहीली. कांद्याला बाजारात आज १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. निर्यातबंदी उठवताना सरकारने ५५० डाॅलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य लावले.

तसेच त्यावर ४० टक्के निर्यात शुल्कही आहे. त्यामुळे भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला. परिणामी भारतातून कांदा निर्यात कमी होऊन भाववाढही मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे, असे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

Agriculture Market
Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?

केंद्र सरकारने हरभरा आयात शुल्क काढले. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात आज काहीशी नरमाई आली. देशात कडधान्याचे भाव वाढले. देशातील हरभरा उत्पादन यंदा घटले आहे. तसेच मागणी असल्याने भाव हमीभावापेक्षा वाढले होते.

हे भाव कमी करण्यासाठी सरकारने आयातशुल्क काढले. यामुळे भाव ५५०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंत नरमले होते. पण हरभरा बाजारातील ही स्थिती जास्त दिवस राहणार नाही, असेही अभ्यासकांनी सांगितले. 

काकडीला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते. सध्या बाजारातील आवक आहे. त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे. लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळेही मागणी आहे.

सध्या काकडीला राज्यभरात प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर चांगले राहू शकतात, असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com